शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये सत्ता कोणाची? नितीश-तेजस्वी यांच्या सत्तेचे भविष्य 'या' ६ जागांच्या निकालावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 10:48 IST

बिहार निवडणुकीच्या निकालाचे कल समोर आले आहेत मात्र त्यातील सहा जागा महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

Bihar Election Result: बिहार विधानसभा निवडणुकीच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यात (६ आणि ११ नोव्हेंबर) झालेल्या मतदानाचे निकाल आज जाहीर होणार आहेत. सकाळी ८ वाजल्यापासून राज्यातील ३८ जिल्ह्यांमध्ये मतमोजणीला सुरुवात होणार असून, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील सहा विधानसभा मतदारसंघांचा निकाल निर्णायक मानला जात आहे. या मतदारसंघांचा इतिहास सांगतो की या जागांवर जो पक्ष जिंकेल, पाटण्यामध्ये त्याचीच सत्ता स्थापन होईल.

या सहा निर्णायक जागांच्या यादीत सर्वात पहिले नाव मधुबनी जिल्ह्यातील केवटी विधानसभा मतदारसंघाचे आहे. या जागेचा ट्रॅक रेकॉर्ड जवळपास १०० टक्के अचूक आहे.१९७७ पासून आजपर्यंत या जागेवर ज्या पक्षाचा उमेदवार विजयी झाला आहे, त्याच पक्षाची किंवा आघाडीची सत्ता राज्यात स्थापन झाली आहे. १९७७ मध्ये जनता पक्षाची, ८० आणि ८५ मध्ये काँग्रेसची, त्यानंतर जनता दल आणि आरजेडीच्या उमेदवारांचा या जागांवर विजय झाला आणि राज्यांत त्यांच्याच पक्षाची सत्ता आली. 

२००५ आणि २०१० मध्ये भाजप जिंकली, तेव्हा नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सत्तेत होती. केवटीमध्ये २०१५ साली आरजेडी जिंकली आणि आरजेडी-जेडीयू-काँग्रेसचे महागठबंधन सत्तेत आले. सध्या भाजपचे मुरारी मोहन झा विद्यमान आमदार असून, त्यांचा सामना आरजेडीचे उमेदवार फराझ फातमी यांच्याशी होत आहे.

त्याचप्रमाणे, राज्यात सरकार कोण बनवणार यात सहरसा मतदारसंघही निर्णायक ठरला आहे. १९७७ पूर्वी, काँग्रेस पक्षाने ही जागा सातत्याने जिंकली आणि त्या पक्षाने राज्यात सातत्याने सरकार स्थापन केले. १९७७ मध्ये, जनता पक्षाचे शंकर प्रसाद टेकरीवाल विजयी झाले आणि जनता पक्षाने राज्यात सरकार स्थापन केले. १९८० आणि १९८५ मध्ये, काँग्रेसचे रमेश झा आणि सतीश चंद्र झा पुन्हा विजयी झाले आणि राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन झाले. १९९० ते २००० पर्यंत, टेकरीवाल यांनी जनता दल आणि आरजेडीच्या तिकिटावर येथून पुन्हा विजय मिळवला. राज्यात त्याच पक्षाने सरकार स्थापन केले आणि टेकरीवाल लालू-राबडी सरकारमध्ये मंत्री झाले. २००५ आणि २०१० मध्ये भाजपने येथे विजय मिळवला. २०१५ मध्ये आरजेडी आणि २०२० मध्ये पुन्हा भाजपने ही जागा जिंकली. सध्या, भाजपचे विद्यमान आमदार आलोक रंजन झा आहेत. झा पुन्हा एकदा निवडणूक लढवत आहेत. महाआघाडीतील आयआयपीच्या इंद्रजीत गुप्ता यांच्याशी त्यांची लढत आहे.

मुजफ्फरपूर जिल्ह्यातील सकरा विधानसभा मतदारसंघही खूप महत्त्वाचा आहे. १९७७ नंतर येथे केवळ एकदाच गडबड झाली. बाकी, प्रत्येक वेळी येथे विजयी झालेला पक्षच पाटण्यातील सत्तेत बसला आहे. इतर तीन टर्निंग पॉइंट जागायाशिवाय, मुंगेर विधानसभा जागेवरही १९८५ मध्ये एकदाच अपवाद वगळता, येथे जिंकणारा पक्ष सत्तेत आला आहे. मुंगेरचे प्रतिनिधित्व सध्या भाजपचे प्रणय कुमार यादव करत आहेत. तसेच, पूर्वी चंपारणची पिपरा ही एक जागा आहे जिथे २०१५ मध्ये केवळ एकदाच गडबड झाली होता. येथे भाजप जिंकली, पण राज्यात महागठबंधनचे सरकार बनले.

शेखपुरा जिल्ह्यातील बरबीघा ही एक आणखी महत्त्वाची जागा आहे, जी १९७७ पासून सत्तेसाठी महत्त्वाची ठरली आहे. २०१५ तसेच २०२० मध्ये जेडीयूने येथे विजय मिळवला आहे. या सहा जागांचे निकाल हे केवळ मतदारसंघाचे भवितव्य नव्हे, तर बिहारमध्ये नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनणार की तेजस्वी यादव सत्ता काबीज करणार, याचे स्पष्ट संकेत देतील. मतमोजणी जसजशी पुढे सरकेल, तसतसे या महत्त्वाच्या जागांवर कोणाचा विजय होतो, याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Bihar Election: Fate of Nitish-Tejashwi depends on these 6 seats.

Web Summary : Bihar election results hinge on six key constituencies. Historically, the winning party in these areas often forms the government. All eyes are on these seats to determine if Nitish Kumar remains Chief Minister or if Tejashwi Yadav takes power.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५Rashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलBJPभाजपाJanta Dal Unitedजनता दल युनायटेड