शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

ट्रिपल तलाक रद्द केल्याने माेदींचे नाव समाज सुधारकांमध्ये घेतले जाईल : अमित शहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2019 20:44 IST

ट्रिपल तलाक रद्द केल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र माेदींचे नाव इतिहासात समाजसुधारकांमध्ये घेतले जाईल असे वक्तव्य गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे.

नवीदिल्ली : ट्रिपल तलाकला विराेध हा केवळ व्हाेट बॅंक शाबूत ठेवण्यासाठी केला जात आहे. ट्रिपल तलाक हटविण्याची काेणाच्यात हिम्मत हाेत नव्हती. परंतु माेदींनी ट्रिपल तलाक रद्द केला. यासाठी माेदींचे नाव इतिहासात समाजसुधारकांमध्ये घेतले जाईल असे वक्तव्य गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. दिल्लीतील काॅन्स्टिट्युशनल क्लबमध्ये आयाेजित कार्यक्रमात ते बाेलत हाेते. 

शहा म्हणाले, ट्रिपल तलाक ही एक कुप्रथा हाेती. यावर आता कायदा झाल्याने मुस्लिम महिलांना त्यांचा हक्क मिळाला आहे. 16 मुस्लिम राष्टांनी देखील ट्रिपल तलाक हद्दपार केला आहे. आपल्याला 56 वर्षे लागली. यासाठी काॅंग्रेसचे मतांचे राजकारण कारणीभूत आहे. ट्रिपल तलाक रद्द करणे जर गैर इस्लामिक असते तर इतर इस्लामी राष्ट्रांनी ताे का हद्दपार केला असता. 

पुढे बाेलताना शहा म्हणाले, पाच वर्षाच्या कार्यकाळात माेदी सरकारने 25 ऐतिहासिक निर्णय घेऊन देशाची दिशा बदलण्याचे काम केले. ही माेदींच्या नेतृत्वाची कमाल आहे. ट्रिपल तलाक रद्द करण्यात मुस्लिम जनतेचाच फायदा आहे. 50 टक्के मुस्लिम महिलांना या प्रथेचा त्रास सहन करावा लागत हाेता. आम्ही जर हे विधेयक संसदेत मांडलं नसतं तर हा भारतावरील सर्वात माेठा डाग असला असता. यासाठी मुस्लिम महिलांनी माेठा संघर्ष केला आहे. शहबानाेला ट्रिपल तलाक देण्यात आला तेव्हा ती सर्वाेच्च न्यायालयापर्यंत गेली. जे राजकारण काॅंग्रसने 60 च्या दशकानंतर सुरु केले त्याचे अनुसरण सर्वच राजकीय पक्षांनी केले. त्याचा परिणाम भारतीय लाेकशाही व सामजिक जीवनावर पडल्याचे दिसून येते. विकासाच्या वाटेत जाे मागे पडला आहे त्याला वरती आणण्याची गरज आहे. याने समाज सर्वस्पर्शी आणि सर्वसमावेशक हाेईल. 

टॅग्स :Amit Shahअमित शहाNarendra Modiनरेंद्र मोदीtriple talaqतिहेरी तलाक