शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

जया बच्चन यांच्या 'रागा'वर 'महाभारत'मधील ‘अर्जुना’ची टिप्पणी; केली वादग्रस्त कॉमेंट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 12:58 AM

टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका महाभारतमध्ये (Mahabharat) अर्जुनची (Arjun) भूमिका साकारणारे अभिनेता फिरोज खान (Actor Firoz Khan) यांनी बॉलिवूड मधील ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांना ट्रोल करताना अपशब्द वापरले आहेत. फिरोज खान यांनी त्यांच्या एका ट्विटमध्ये जया बच्चन यांच्यासंदर्भात भाष्य केले आहे.

नवा दिल्ली - संसदेतील जोरदार भाषणानंतर अभिनेत्री आणि राज्यसभा खासदार जया बच्चन सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहेत. जया बच्चन यांनी नुकतेच राज्यसभेत भाषण केले, यावेळी त्या प्रचंड संतापल्याचे बघायला मिळाले. या भाषणादरम्यान त्यांनी भाजपला शापही दिला. त्यांच्या या भाषणावर आता प्रसिद्ध टीव्ही कलाकार फिरोज खान यांनी टिप्पणी केली आहे.

‘अर्जुना’ने केली वादग्रस्त कॉमेंट -टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका महाभारतमध्ये (Mahabharat) अर्जुनची (Arjun) भूमिका साकारणारे अभिनेता फिरोज खान (Actor Firoz Khan) यांनी बॉलिवूड मधील ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांना ट्रोल करताना अपशब्द वापरले आहेत. फिरोज खान यांनी त्यांच्या एका ट्विटमध्ये जया बच्चन यांच्यासंदर्भात भाष्य केले आहे.

काय आहे वादग्रस्त कॉमेंट?जया बच्चन यांनी संसदेत भाषण करून दोन दिवस झाले, पण अद्यापही हे प्रकरण शांत होताना दिसत नाही. अशातच, अभिनेता फिरोज खान यांनी ट्विट करत, ‘अमिताभ बच्चन यांनी गेल्या 50 वर्षांत जी प्रतिष्ठा कमावली होती, त्यांच्या ‘नटगुल्ली’ पत्नीने त्या प्रतिष्ठेचा कचरा केला,’ असे म्हटले आहे. फिरोज खान यांचे हे ट्विट सोशल मीडियावर वेगने व्हायरल होत आहे. त्यांच्या या ट्विटवर त्यांच्या समर्थनार्थ आणि विरोधातही लोक प्रतिक्रिया देत आहेत.

भाजपला दिला होता शाप -  समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी राज्यसभेत सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्ला चढवला होता. लवकरच तुचे वाईट दिवस येणार आहेत, अशा शब्दांत जया बच्चन यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. दरम्यान, ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) अंमलबजावणी संचालनालयात हजर झाल्यानंतर जया बच्चन यांची ही टिप्पणी आली आहे.

यावेळी, माझ्यावर वैयक्तिकरित्या टीका करण्यात आली, पण मला कोणावरही वैयक्तिक टीका करायची नाही, असे जया बच्चन यांनी राज्यसभेत सांगितले. तसेच, मी तुम्हा लोकांना शाप देते की तुमचे वाईट दिवस लवकरच येणार आहेत, असे म्हणत त्यांनी भाजपवर हल्ला चढवला होता. 

टॅग्स :Jaya Bachchanजया बच्चनRajya Sabhaराज्यसभाMahabharatमहाभारतFiroz Khanफिरोज खानBJPभाजपा