शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

३० वर्षीय विवाहितेचे १७ वर्षांच्या तरुणाशी संबंध, मुलीने आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्यावर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 10:08 IST

Uttar Pradesh Crime News: गेल्या काही वर्षांमध्ये विवाहबाह्य अनैतिक संबंध आणि त्यामधून घडणाऱ्या गुन्ह्यांचं प्रमाण लक्षणीयरीत्या वाढलं आहे. तसेच या संबंधांमध्ये वय, नाती यांच्याही मर्यादा उरलेल्या नाहीत. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील हाथरस जिल्ह्यातील सिकंदराराऊ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावात अनैकित संबंधांमधून अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये विवाहबाह्य अनैतिक संबंध आणि त्यामधून घडणाऱ्या गुन्ह्यांचं प्रमाण लक्षणीयरीत्या वाढलं आहे. तसेच या संबंधांमध्ये वय, नाती यांच्याही मर्यादा उरलेल्या नाहीत. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील हाथरस जिल्ह्यातील सिकंदराराऊ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावात अनैकित संबंधांमधून अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका सहा वर्षांच्या मुलीच्या हत्येप्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली आहे. तर एका तरुणालाही ताब्यात घेण्यात आलं आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार उर्वी नावाची सहा वर्षांची मुलगी बुधवारी सकाळी १० वाजता तिच्या घरातून बेपत्ता झाली होती. दरम्यान, दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास तिचा मृतदेह जवळच असलेल्या विहिरीत सापडला. हा मृतदेह एका तागाच्या गोणीत भरलेला होता. तसेच मृतदेहाच्या गळ्यात कपडा बांधलेला होता.

पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये सदर व्यक्तीची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. याबाबत अधिक माहिती देताना अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक कुमार सिंह यांनी सांगितले की, या मुलीने आरोपी महिला आणि एका अल्पवयीन मुलाला आक्षेपार्ह स्थितीत पाहिले होते. तसेच ही बाब वडिलांना सांगण्याची धमकी तिने दिली होती. त्यामुळे घाबरलेल्या महिलेने तिच्या प्रियकराच्या मदतीने या मुलीची गळा आवळून हत्या केली होती.

पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये आरोपी महिलेने मागच्या तीन महिन्यांपासून तिचे एका १७ वर्षीय मुलासोबत संबंध असल्याचे मान्य केले. ही घटना घडली त्या दिवशी सदर महिलेचा पती आणि सासू घराबाहेर गेले होते. ही संधी साधून तिने या मुलाला घरात बोलवले होते. तसेच त्यांचे अश्लील चाळे सुरू होते.

या दरम्यान, या महिलेची मुलगी अचानक तिथे आली. तसेच तिने याबाबत वडिलांना सांगण्याची धमकी दिली. या धमकीमुळे घाबरलेली महिला आणि तिच्यासोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्या मुलाने या मुलीची हत्या केली. तसेच तिचा मृतदेह एका गोणीमध्ये भरून रिकामी विहिरीत फेकून दिला. अटक करण्यात आली तेव्हा आरोपी महिलेच्या हातावर चावल्याच्या खुणा होत्या. या खुणा मुलीने जीव वाचवण्याचा प्रयत्नात चावा घेतल्याने झाल्या असाव्यात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.  

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश