शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
2
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
3
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
4
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
5
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
6
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
7
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
8
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
9
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
10
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
11
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
12
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
13
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
14
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
15
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
16
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
17
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
18
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
19
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

विरोधकांपेक्षा सत्ताधाऱ्यांतील बंडखोरांचेच आव्हान औत्सुक्याचे !

By किरण अग्रवाल | Published: October 06, 2019 1:14 AM

निवडणुकीचे राजकारण म्हटले की, त्यात बंडखोºया या होतच राहतात. पण, सत्ताधाऱ्यांकडून एकतर्फी निवडणुकीचे व लाटेचे चित्र दर्शविले जात असताना त्यांच्याच पक्षात बंडाळ्या करून शह देऊ पाहणारे पुढे येतात आणि संबंधित पक्षही परपक्षीय उमेदवार खांद्यावर घेताना दिसतात, तेव्हा त्यातून राजकीय बेभरवशाचीच स्थिती उघड होऊन गेल्याशिवाय राहत नाही.

ठळक मुद्देअनुकूलतेची स्थिती असेल तर स्वकीयांना डावलून परपक्षियांचे ओझे का बाळगले जावे?भाजपचे शिस्तीचे संस्कार कमी पडलेत की काय?शिवसेनेची तर या निवडणुकीच्या निमित्ताने चांगलीच दमछाक झालेली दिसून आली

सारांशइच्छाशक्ती प्रबळ असेल तर आव्हानांची चिंता बाळगली जात नाही हेच खरे असल्याने, अखेर पक्षीय निर्णयांना धुडकावून लावत अनेकांनी विधानसभा निवडणुकीसाठी बंडाचे निशाण फडकावले आहे. यातील इच्छुकांचे राजकारण समजूनही घेता यावे, परंतु सत्ताधाºयांकडून लाटेच्या चर्चा आजही केल्या जात असताना त्यांच्याच पक्षात मोठ्या प्रमाणात बंडाळी दिसून येत असेल तर त्या कथित लाटेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यावाचून राहू नयेत.विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी नाशिक जिल्ह्यातही सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या इच्छुकांनी बंडखोरी केल्याचे स्पष्ट झाले. विशेषत: नाशिक पूर्व मतदारसंघात भाजपतर्फे उपमहापौर, महापौर व नंतर आमदारकी भूषविलेल्या व मंत्रिपदाच्याही शर्यतीत धावलेल्या बाळासाहेब सानप यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. सानप यांनी लोकप्रतिनिधित्व करतानाच भाजपचे शहराध्यक्षपदही निभावले आहे व त्यांच्याच नेतृत्वात नाशिक महापालिकेत या पक्षाला स्वबळावर सत्ता मिळवता आली आहे. पक्षाध्यक्ष म्हणून कार्य करताना पक्षाला ‘अर्थ’वाही करण्यात त्यांची भूमिका मोठी राहिल्याचेही बोलले जात असताना सानप बंडखोरी करतात याचा अर्थ, भाजपचे शिस्तीचे संस्कार कमी पडलेत की काय?महत्त्वाचे म्हणजे, सानप यांच्यासोबतच पक्षातील १६ जणांनी उमेदवारीसाठी रितसर मुलाखती दिल्या होत्या. सानप यांचे तिकीट कापताना त्यापैकी कुणासही उमेदवारी मिळाली असती तर सानप यांची बंडखोरी कदाचित टळली असती. सानप यांनी हाच मुद्दा घेऊन आता निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. अर्थात, अर्ज दाखल करायच्या अखेरच्या दिवशी परपक्षातून आलेल्यास भाजपकडून उमेदवारी बहाल केली गेल्याने लाटेवर निवडून यायची भाषा करणाºया या पक्षाला स्वपक्षात निवडून आणण्यायोग्य एकही उमेदवार आढळला नाही की काय? असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक ठरले. पक्षाच्या पडतीच्या काळात पराभव निश्चित असूनही ‘इलेक्टिव्ह मेरीट’चा विचार न करता उमेदवारी देणारा भाजप, आज पक्ष ऐन भरात असतानाही उधार-उसनवारीच्या उमेदवारीवर निवडणुकीस सामारे जात असल्याचे पाहता, त्यातून स्वकीयांचे खच्चीकरण तर घडून यावेच, शिवाय राजकारणातील शुचिता व तत्त्वनिष्ठेच्या बाबतीत आजवर केल्या गेलेल्या ‘पार्टी विथ डिफरन्स’च्या भूमिकेचा बुरखाही गळून पडावा.भाजपचा सहयोगी पक्ष शिवसेनेची तर या निवडणुकीच्या निमित्ताने चांगलीच दमछाक झालेली दिसून आली आहे. एक तर ‘युती’साठी लहान भावाची भूमिका स्वीकारण्यावाचून त्यांच्यासमोर पर्याय नव्हता आणि दुसरे म्हणजे ‘युती’त राहूनही काही उमेदवार निवडून येण्याचा त्यांना विश्वास नसावा. त्यामुळे इगतपुरीत त्यांनाही परपक्षीय निर्मला गावित यांच्या हाती शिवबंधन बांधावे लागले. दिंडोरीत अन्य सक्षम पर्याय उपलब्ध असतानाही, गेल्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्ष सोडून राष्टÑवादीत गेलेल्या व तेथे पराभव चाखून परतलेल्या धनराज महाले यांनाच अगोदर बोहोल्यावर चढविले गेले व ते अंगाशी आल्यावर ऐनवेळी उमेदवारी बदलण्याची नामुष्की ओढवली. इमाने इतबारे पक्षकार्य करणाºयांना केवळ झेंडा धरायला लावून भलत्यांचेच भले करू पाहण्याची शिवसेनेतील अलीकडील व्यवस्था त्यामुळेच निष्ठावंतांना अस्वस्थ करणारी ठरू पाहते आहे.नाशकातील तीनपैकी किमान एकतरी जागा ‘युती’अंतर्गत शिवसेनेला मिळावी अशी स्थानिकांची मागणी होती. पण, त्याकडेही दुर्लक्ष झाल्याने नाशिक पश्चिममध्ये बंडाळी झाली आहे. रडायचे नाही, लढायचे म्हणत सारे शिवसैनिक एकवटले असून, तिघांनी अर्ज दाखल केले आहेत. शिवाय, विधानसभेच्या तिकिटासाठी भाजपची एक नगरसेविका राष्टÑवादीत तर शिवसेनेचा एक नगरसेवक मनसेत गेला आहे. त्यामुळे सानप असोत की अन्य कुणी, यांच्या बंडखोºया भाजप उमेदवारांसाठी अडचणीच्याच ठरण्याची शक्यता नाकारता येऊ नये. यातील त्यांचा जय-पराजय हा नंतरचा विषय. मुद्दा एवढाच की, एकीकडे विजय निश्चित असल्याचा आविर्भाव बाळगणारे समोर असतानाही इतरांकडून बंडखोºया करीत मैदानात उतरण्याचे धाडस दाखविले जात असल्याचे पाहता त्यांचा आत्मविश्वास व त्यांच्याकडून दिले जाणारे आव्हान औत्सुक्याचे ठरावे. कारण विरोधी पक्षांशी द्यावी लागणारी लढत वेगळी आणि स्वकीयांशीच दोन हात करण्याची नामुष्की वेगळी असते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण