शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
3
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
4
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
5
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
6
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
7
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
8
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
9
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
10
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
11
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
12
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
13
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
14
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
15
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
16
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
17
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
18
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
19
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
20
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांपेक्षा सत्ताधाऱ्यांतील बंडखोरांचेच आव्हान औत्सुक्याचे !

By किरण अग्रवाल | Updated: October 6, 2019 01:20 IST

निवडणुकीचे राजकारण म्हटले की, त्यात बंडखोºया या होतच राहतात. पण, सत्ताधाऱ्यांकडून एकतर्फी निवडणुकीचे व लाटेचे चित्र दर्शविले जात असताना त्यांच्याच पक्षात बंडाळ्या करून शह देऊ पाहणारे पुढे येतात आणि संबंधित पक्षही परपक्षीय उमेदवार खांद्यावर घेताना दिसतात, तेव्हा त्यातून राजकीय बेभरवशाचीच स्थिती उघड होऊन गेल्याशिवाय राहत नाही.

ठळक मुद्देअनुकूलतेची स्थिती असेल तर स्वकीयांना डावलून परपक्षियांचे ओझे का बाळगले जावे?भाजपचे शिस्तीचे संस्कार कमी पडलेत की काय?शिवसेनेची तर या निवडणुकीच्या निमित्ताने चांगलीच दमछाक झालेली दिसून आली

सारांशइच्छाशक्ती प्रबळ असेल तर आव्हानांची चिंता बाळगली जात नाही हेच खरे असल्याने, अखेर पक्षीय निर्णयांना धुडकावून लावत अनेकांनी विधानसभा निवडणुकीसाठी बंडाचे निशाण फडकावले आहे. यातील इच्छुकांचे राजकारण समजूनही घेता यावे, परंतु सत्ताधाºयांकडून लाटेच्या चर्चा आजही केल्या जात असताना त्यांच्याच पक्षात मोठ्या प्रमाणात बंडाळी दिसून येत असेल तर त्या कथित लाटेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यावाचून राहू नयेत.विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी नाशिक जिल्ह्यातही सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या इच्छुकांनी बंडखोरी केल्याचे स्पष्ट झाले. विशेषत: नाशिक पूर्व मतदारसंघात भाजपतर्फे उपमहापौर, महापौर व नंतर आमदारकी भूषविलेल्या व मंत्रिपदाच्याही शर्यतीत धावलेल्या बाळासाहेब सानप यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. सानप यांनी लोकप्रतिनिधित्व करतानाच भाजपचे शहराध्यक्षपदही निभावले आहे व त्यांच्याच नेतृत्वात नाशिक महापालिकेत या पक्षाला स्वबळावर सत्ता मिळवता आली आहे. पक्षाध्यक्ष म्हणून कार्य करताना पक्षाला ‘अर्थ’वाही करण्यात त्यांची भूमिका मोठी राहिल्याचेही बोलले जात असताना सानप बंडखोरी करतात याचा अर्थ, भाजपचे शिस्तीचे संस्कार कमी पडलेत की काय?महत्त्वाचे म्हणजे, सानप यांच्यासोबतच पक्षातील १६ जणांनी उमेदवारीसाठी रितसर मुलाखती दिल्या होत्या. सानप यांचे तिकीट कापताना त्यापैकी कुणासही उमेदवारी मिळाली असती तर सानप यांची बंडखोरी कदाचित टळली असती. सानप यांनी हाच मुद्दा घेऊन आता निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. अर्थात, अर्ज दाखल करायच्या अखेरच्या दिवशी परपक्षातून आलेल्यास भाजपकडून उमेदवारी बहाल केली गेल्याने लाटेवर निवडून यायची भाषा करणाºया या पक्षाला स्वपक्षात निवडून आणण्यायोग्य एकही उमेदवार आढळला नाही की काय? असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक ठरले. पक्षाच्या पडतीच्या काळात पराभव निश्चित असूनही ‘इलेक्टिव्ह मेरीट’चा विचार न करता उमेदवारी देणारा भाजप, आज पक्ष ऐन भरात असतानाही उधार-उसनवारीच्या उमेदवारीवर निवडणुकीस सामारे जात असल्याचे पाहता, त्यातून स्वकीयांचे खच्चीकरण तर घडून यावेच, शिवाय राजकारणातील शुचिता व तत्त्वनिष्ठेच्या बाबतीत आजवर केल्या गेलेल्या ‘पार्टी विथ डिफरन्स’च्या भूमिकेचा बुरखाही गळून पडावा.भाजपचा सहयोगी पक्ष शिवसेनेची तर या निवडणुकीच्या निमित्ताने चांगलीच दमछाक झालेली दिसून आली आहे. एक तर ‘युती’साठी लहान भावाची भूमिका स्वीकारण्यावाचून त्यांच्यासमोर पर्याय नव्हता आणि दुसरे म्हणजे ‘युती’त राहूनही काही उमेदवार निवडून येण्याचा त्यांना विश्वास नसावा. त्यामुळे इगतपुरीत त्यांनाही परपक्षीय निर्मला गावित यांच्या हाती शिवबंधन बांधावे लागले. दिंडोरीत अन्य सक्षम पर्याय उपलब्ध असतानाही, गेल्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्ष सोडून राष्टÑवादीत गेलेल्या व तेथे पराभव चाखून परतलेल्या धनराज महाले यांनाच अगोदर बोहोल्यावर चढविले गेले व ते अंगाशी आल्यावर ऐनवेळी उमेदवारी बदलण्याची नामुष्की ओढवली. इमाने इतबारे पक्षकार्य करणाºयांना केवळ झेंडा धरायला लावून भलत्यांचेच भले करू पाहण्याची शिवसेनेतील अलीकडील व्यवस्था त्यामुळेच निष्ठावंतांना अस्वस्थ करणारी ठरू पाहते आहे.नाशकातील तीनपैकी किमान एकतरी जागा ‘युती’अंतर्गत शिवसेनेला मिळावी अशी स्थानिकांची मागणी होती. पण, त्याकडेही दुर्लक्ष झाल्याने नाशिक पश्चिममध्ये बंडाळी झाली आहे. रडायचे नाही, लढायचे म्हणत सारे शिवसैनिक एकवटले असून, तिघांनी अर्ज दाखल केले आहेत. शिवाय, विधानसभेच्या तिकिटासाठी भाजपची एक नगरसेविका राष्टÑवादीत तर शिवसेनेचा एक नगरसेवक मनसेत गेला आहे. त्यामुळे सानप असोत की अन्य कुणी, यांच्या बंडखोºया भाजप उमेदवारांसाठी अडचणीच्याच ठरण्याची शक्यता नाकारता येऊ नये. यातील त्यांचा जय-पराजय हा नंतरचा विषय. मुद्दा एवढाच की, एकीकडे विजय निश्चित असल्याचा आविर्भाव बाळगणारे समोर असतानाही इतरांकडून बंडखोºया करीत मैदानात उतरण्याचे धाडस दाखविले जात असल्याचे पाहता त्यांचा आत्मविश्वास व त्यांच्याकडून दिले जाणारे आव्हान औत्सुक्याचे ठरावे. कारण विरोधी पक्षांशी द्यावी लागणारी लढत वेगळी आणि स्वकीयांशीच दोन हात करण्याची नामुष्की वेगळी असते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण