शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:08 IST

तंटामुक्ती अध्यक्षपदी कदम निवघा बाजार : येथील तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी बाबाराव कदम, तर उपाध्यक्षपदी भीमराव देशमुख यांची नियुक्ती ...

तंटामुक्ती अध्यक्षपदी कदम

निवघा बाजार : येथील तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी बाबाराव कदम, तर उपाध्यक्षपदी भीमराव देशमुख यांची नियुक्ती झाली. यावेळी सरपंच शरद कदम, उपसरपंच श्याम कदम, ग्रामसेवक दीपक झरकर, भास्करराव कदम, मधुकर कदम, शिवाजी देशमुख, अरविंद नरवाडे, अमोल कदम, गजानन कदम, जयराम पाईकराव आदी उपस्थित होते.

अधिकारी सावंत सेवानिवृत्त

उमरी : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उमरी शाखेचे वरिष्ठ अधिकारी तानाजी पाटील सावंत सेवानिवृत्त झाले. त्यांना एका कार्यक्रम निरोप देण्यात आला. यावेळी तपासणी अधिकारी जी. आर. कवळे, प्रतिष्ठित नागरिक राजेश्वर वंगलवार, पोलीसपाटील दत्तात्रय वराडे आदी उपस्थित होते.

विद्यार्थी, पालक अस्वस्थ

नायगाव : दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या. बारावीसंदर्भात काय निर्णय घेतला जातो याकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागले आहे. परीक्षा रद्द झाली तर पुढील अभ्यासक्रमांच्या पात्रता परीक्षा कशा द्यायच्या, असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात आहे. त्यामुळे या संदर्भातील निर्णय लवकर घेण्याची मागणी होत आहे.

दुचाकी लंपास

किनवट : गंगानगर, किनवट येथून चोरट्यांनी दुचाकी लांबविली. नारायण बाभूळकर लग्नाला गेले होते. त्यांच्या घरासमोरून २४ एप्रिल रोजी दुचाकी (एमएच २६ एफ ६४६८) चोरट्यांनी लांबविली, किनवट पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. चौधरी तपास करीत आहेत.

भाजीपाला उत्पादक संकटात

हदगाव : हदगाव तालुक्यातील बामणी फाटा, पळसा, मनाठा, चिंचगव्हाण, करमुडी, सिबदरा, कवाना, पिंगळी परिसरातील आठवडी बाजार बंद असल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. कोरोनामुळे आठवडी बाजारांना परवानगी नाही. भाजीपाला मोठ्या प्रमाणात उत्पादित झाला. त्यामुळे भाजीपाला विकावा कुठे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

सहा गावांच्या सीमा बंद

अर्धापूर : तालुक्यातील लहान, गणपूर, मालेगाव, जांभरुण, लोणी (खु.), लोणी बु. या गावांच्या सीमा कोरोनामुळे बंद करण्यात आल्या आहेत. या भागात कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे हा निर्णय घेण्यात आला. नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये, मास्क लावावा, असे आवाहन करण्यात आले.

वीज पडून गोठ्यास आग

हिमायतनगर : तालुक्यातील वारंग टाकळी येथे वीज पडून गोठ्यास आग लागल्याची घटना ३० एप्रिल रोजी घडली. आगीत उपयोगी साहित्य जळून खाक झाले. माधव राचटकर यांचा गोठा होता. आग लागल्याचे पाहून शेजारी मारोती देवकते यांनी तातडीने धाव घेऊन गोठ्यातील दोन बैल सोडून दिल्याने बैलाचे प्राण वाचले. तथापि, आगीच्या घटनेत एक लाखाचे नुकसान राचटकर यांना सोसावे लागले.

भुईमूग काढणीला सुरुवात

किनवट : तालुक्यातील सिंदगी व परिसरात रबी पिके काढणीच्या कामांनी वेग घेतला. भुईमुगाचे अल्प उत्पादन झाल्याने खर्चसुद्धा निघणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्यावर्षीपासून कोरोनामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शासनाने हात आखडता घेतला असून, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

दोन दुकानदारांवर गुन्हे

धर्माबाद : ‘ब्रेक द चेन’ नियमाचे उल्लंघन करणाऱ्या दोन दुकानदारांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तेलंगणा बसस्थानकाजवळील एम.ए. अजित इलेक्ट्रिक तसेच मच्छी मार्केट भागातील बहार चिकण सेंटर अशी दुकानांची नावे आहेत. परवानगी नसतानाही दुकाने चालू ठेवून नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप या दोघांवर आहे.

तीन जनावरे दगावली

लोहा : तालुक्यातील २ मे रोजी दुपारी विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. तालुक्यातील जामगा शिवणी, अंतेश्वर व मडकी येथे वीज पडून तीन जनावरे दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. अंतेश्वर येथील संजय कऱ्हाळे, जामगा शिवणी येथील सोनाजी जामगे, मडकी येथील बालाजी कदम यांचे नुकसान झाले.

अवकाळी पावसाचा तडाखा

नायगाव : तालुक्यातील कृष्णूर शिवारात रविवारी दुपारी वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली. जनावरे, शेळ्या, मेंढ्या यांचे हाल झाले. पावसाचा वेग प्रचंड होता. मशागत केलेल्या शेतांना पावसाचा फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे.