शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

खावटी योजनेसाठी जिल्ह्यातील १०,२८४ आदिवासी कुटुंबांचे अर्ज मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:28 IST

राज्याचे आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांनी ही योजना पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडला ...

राज्याचे आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांनी ही योजना पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडला होता. पालकमंत्री चव्हाण यांनीही हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी खावटी योजना पुनरुज्जीवित करण्याचा निर्णय घेतला व १ मे रोजी ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात आली आहे.

या खावटी योजनेंतर्गत महाराष्ट्रातील सुमारे ११ लाख ५५ हजार आदिवासी कुटुंबांना प्रत्येकी चार हजार रुपयांचा लाभ दिला जाईल. यामध्ये दोन हजार रुपये किमतीचे अन्नधान्य व इतर वस्तू, तसेच दोन हजार रुपये रोख बँक खात्यामार्फत दिले जाणार आहेत. या योजनेसाठी राज्यस्तरावर सुमारे ४८२ कोटी रुपये खर्च केले जातील. प्रामुख्याने दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासींसाठी महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय मोठा दिलासा देणारा ठरला आहे.

चौकट........................

किनवट तालुक्याला सर्वाधिक लाभ

नांदेड जिल्ह्यामध्ये या योजनेचा सर्वाधिक लाभ आदिवासीबहूल किनवट तालुक्याला मिळणार असून, आजपावेतो येथील ५ हजार १२७ अर्जदार या योजनेसाठी पात्र ठरले आहेत. त्याखालोखाल माहूर १ हजार ७७२, हदगाव १ हजार ७६५, हिमायतनगर ८०७, तर भोकर तालुक्यातील ६९२ अर्जदार या योजनेचे लाभार्थी ठरणार आहेत. या योजनेबाबत बोलताना पालकमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, यापूर्वी खावटी कर्जरूपात दिली जायची व ते कर्ज नंतर परत करावे लागायचे. या योजनेमध्ये मिळणारी रक्कम हे अनुदान स्वरूपात असणार आहे.