शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

युद्धाच्या वेळी भीती नसते, शत्रूला संपविणे हेच लक्ष्य ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:08 IST

निशांत वानखेडे नागपूर : युद्धाच्या वेळी शत्रूकडून फायरिंग सुरू असताना तुम्हाला भीती वाटत नाही का, असा प्रश्न केला जाताे. ...

निशांत वानखेडे

नागपूर : युद्धाच्या वेळी शत्रूकडून फायरिंग सुरू असताना तुम्हाला भीती वाटत नाही का, असा प्रश्न केला जाताे. मात्र एकदा सीमेवर गेले की ‘भीती’ नावाचा शब्दच नाहीसा हाेताे. शत्रू समाेर असला की रक्त आपाेआप सळसळते. समाेरच्या शत्रूला संपवायचे किंवा देशासाठी बलिदान करायचे, हा एकच ध्यास मनात असताे आणि कारगिल युद्धाच्या वेळीही तेच ध्येय हाेते. काटाेलचे रहिवासी नायक रत्नाकर ठाकरे यांच्याकडून युद्धाचा थरार ऐकताना अंगावर काटा उभा राहिला.

मूळचे मराठा बटालियनचे असलेले नायक ठाकरे त्यावेळी द्रास सेक्टरला पाेस्टिंगवर हाेते. विविध बटालियनमधून निवडलेल्यांच्या टीममध्ये त्यांचाही समावेश हाेता. ४ मे राेजी हालचाली हाेत असल्याची माहिती मिळाली व २० मेपर्यंत चित्र स्पष्ट हाेत गेले. द्रास सेक्टरमध्ये आम्ही तैनात झालाे. सुरुवातीलाच मनजित सिंह हा अवघ्या १८ वर्षाचा तरुण शहीद झाला हाेता. त्यामुळे प्रत्येकाचे रक्त खवळले हाेते. वरिष्ठांच्या आदेशाची प्रतीक्षा करायची आणि समाेर कूच करत जायचे, हे सत्र चालले हाेते. समाेरून पाकिस्तानी सैन्याची फायरिंग सुरू असायची आणि आम्ही त्याला उत्तर द्यायचाे. दिवसभर एका ठिकाणी बसून रेकी करायची आणि रात्रीच्या किर्र अंधारात कूच करायची. ५३ दिवस हा लढा चालला हाेता. २६ जुलैला आमच्या जवानांनी टायगर हिल्सवर तिरंगा फडकाविला आणि आमचे ऊर भरून आले. ताे खरेच भावनिक क्षण हाेता. मनात एकच गाणे हाेते, ‘अपनी आझादी काे हम हरगिज मिटा सकते नहीं, सर कटा सकते है लेकीन सर झुका सकते नहीं...’

परतलाे तेव्हा घरच्यांचे ऊर भरून आले

नायक ठाकरे यांच्या लग्नाला अवघी तीन वर्षे झाली हाेती. एक मुलगी हाेती. कारगिल युद्ध सुरू झाल्यानंतर माझी पाेस्टिंग त्यात झाल्याचे समजताच पत्नी बेशुद्ध पडली हाेती. गावकऱ्यांनी तिला समजावले. मात्र हा संपूर्ण काळ कुटुंबासाठी कठीण हाेता. त्यावेळी पत्रव्यवहार हाच आधार हाेता. युद्धाच्या काळात तेही कमी झाले. ‘मी बरा आहे, तुम्ही काळजी घ्या’, एवढेच शब्द सुचायचे. युद्ध संपल्यावर १२ ऑगस्टला घरी परतलाे तेव्हा घरच्यांचा ऊर भरून आला हाेता. चिमुकलीला डाेळा भरून बघितले. गावकऱ्यांनी जल्लाेषात स्वागत केले. माझ्या हस्ते झेंडा फडकविला गेला. यापेक्षा माेठा अभिमान एका सैनिकासाठी काय असताे, अशी भावना ठाकरे यांनी व्यक्त केली.