शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
3
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
4
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
7
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
8
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
9
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
10
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
11
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
12
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
13
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
14
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
15
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
16
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
17
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
18
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
19
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
20
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"

एक होता ‘श्रीनिवास’ नावाचा वाघ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2021 4:10 AM

अभय लांजेवार उमरेड : राज्यभरात गाजलेल्या दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील सहआरोपी श्रीनिवास रेड्डी हे पेंच व्याघ्र प्रकल्पाचे तत्कालीन सीसीएफ ...

अभय लांजेवार

उमरेड : राज्यभरात गाजलेल्या दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील सहआरोपी श्रीनिवास रेड्डी हे पेंच व्याघ्र प्रकल्पाचे तत्कालीन सीसीएफ म्हणून कर्तव्यावर होते. त्यावेळी काही जी-हुजुरी करणाऱ्या वन्यप्रेमींनी साहेबांना खुश करण्यासाठी एका वाघाचे चक्क ‘श्रीनिवास’ असे नामकरण केले. साधारणत: पाच ते सात वर्षांपर्वी करण्यात आलेल्या या नामकरणानंतर आता दीपाली चव्हाण प्रकरणात श्रीनिवास रेड्डी हे जेलची हवा खात आहेत. यावरून उमरेड-कऱ्हांडला-पवनी अभयारण्यातसुद्धा त्यावेळी गाजलेल्या अनेक प्रकरणांची चर्चा रंगू लागली आहे. अभयारण्यातील श्रीनिवास नावाच्या या वाघाचा मृतदेह नागभीड तालुक्यातील एका शेतात आढळून आला होता. त्यामुळे ‘एक होता श्रीनिवास नावाचा वाघ’ अशी प्रतिक्रिया काही वन्यप्रेमींमध्ये व्यक्त होत आहे.

आशिया खंडाचा सुपरस्टार असलेल्या जय नावाचा दमदार वाघसुद्धा श्रीनिवास रेड्डी सीसीएफ असतानाच अचानक गायब झाला होता. जयचे प्रेतही गवसले नाही. त्याचा पत्ता अद्यापही कोणतीही यंत्रणा लावू शकली नाही. यातच गोठणगाववाल्या वाघिणीने दोन बछड्यांना जन्म दिला. या दोन बछड्यांपैकी एकाला श्रीनिवास तर दुसऱ्याला बिट्टू असे नामकरण केल्या गेले. श्रीनिवास आणि बिट्टू अशी जोडी त्यावेळी गाजली होती. शिवाय ‘फेअरी’ हे नावसुद्धा चर्चेत आले होते. फेअरी नावाची एक विदेशी तरुणी काही महिने या परिसरात जंगल सफारीसाठी आली असताना काही वन्यप्रेमींनी तिचे नाव देत तिलाही खुश केले. बड्या अधिकाऱ्यांशी जवळीकता साधण्यासाठी आणि आपली खासगी दलालीचे कामे उरकविण्यासाठी अधिकाऱ्यांचे नाव देण्याची शक्कल त्या काळात चांगलीच गाजली होती.

--

श्रीनिवास खड्ड्यात, बिट्टू जंगलात

जय आणि फेअरी यांच्या सहवासातून जन्मलेल्या श्रीनिवास आणि बिट्टू या दोघांपैकी श्रीनिवास नावाचा वाघ साधारणत: अडीच वर्षाचा असतानाच शेतातील एका खड्ड्यात पुरला गेला होता. विद्युत स्पर्शाने तो मृत्युमुखी पडला. शेतकऱ्याने शेतात प्रेत गाडले. व्हिडिओ कॉलर असल्याने ही घटना नागभीड तालुक्यात उघडकीस आली. दुसरीकडे बिट्टू नावाचा दुसरा वाघ नागभीड परिसरातील तळोधी शिवारातील जंगलात मोकळा श्वास घेत असल्याची माहिती आहे.

सखोल चौकशीची मागणी

१६ जून २०१६ हे जय वाघाचे अखेरचे लोकेशन होते. जय गायब झाल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात झळकल्यानंतरच वन, वन्यजीव खाते खडबडून जागे झाले होते. विशेषत: यादरम्यान दीपाली चव्हाण प्रकरणातील सहआरोपी श्रीनिवास रेड्डी हे सीसीएफ म्हणून पेंच व्याघ्र प्रकल्पात कर्तव्यावर होते. त्यामुळे या प्रकरणाचीसुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आता जोर धरत आहे.

--

त्या काळात श्रीनिवास, बिट्टू, फेअरी असे नामकरण काहींच्या स्वार्थी हट्टामुळे केल्या गेले. ही बाब सत्य आहे. असे जरी असले तरी वन्यजीव विभागाशी या नामकरणाचा कवडीचाही संबंध नव्हता. वन्यजीव विभागाच्या दप्तरी सांकेतिक कोडचाच वापर केला जातो. त्यामुळे अशा नामकरणाला काहीही अर्थ राहत नाही.

सुहास बोकडे

वन्यप्रेमी, उमरेड