शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
2
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
3
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
4
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
5
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
6
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
7
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
8
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
9
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
10
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
11
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
12
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
13
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
14
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
15
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
16
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
17
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
18
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
19
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
20
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
Daily Top 2Weekly Top 5

हायपरबेरिक आॅक्सिजन थेरपी बंद

By admin | Updated: October 7, 2016 02:52 IST

गुंतागुंतीच्या, बऱ्या न होणाऱ्या जखमांनी त्रस्त रुग्णांना विशेषत: मधुमेहाच्या रुग्णांना दिलासा ठरू शकेल अशी ‘हायपरबेरिक आॅक्सिजन थेरपी’

मेडिकलला मिळेना तंत्रज्ञ : उपचाराअभावी गंभीर रुग्ण अडचणीत
गुंतागुंतीच्या, बऱ्या न होणाऱ्या जखमांनी त्रस्त रुग्णांना विशेषत: मधुमेहाच्या रुग्णांना दिलासा ठरू शकेल अशी ‘हायपरबेरिक आॅक्सिजन थेरपी’ सहा महिन्यांपासून बंद आहे. मध्यभारतात केवळ मेडिकलमध्ये हे उपकरण आहे. १ कोटी २० लाखांचे हे उपकरण चालविण्यासाठी मेडिकलला तंत्रज्ञ मिळत नसल्याने रुग्ण अडचणीत आले आहेत.

सुमेध वाघमारे ल्ल नागपूर
भारतामध्ये जगातील सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण आढळतात. मृत्यूच्या कारणामध्ये मधुमेह हे सर्वाधिक कारणापैकी एक आहे. मधुमेह ही व्याधी केवळ रक्तातील वाढलेली शर्करा या स्वरु पात नसून ती शरीरातील महत्वाच्या अवयवांना हळूहळू निकामी करतो. यात गंभीर जखम झाल्यास व त्याकडे दुर्लक्ष केल्यास वेळप्रसंगी संबंधित अवयव कापावा लागतो. अशा जखमांसह, जळीतरुग्ण, गँगरीन व न्यूरोसर्जरी नंतर त्रास होत असलेल्या रुग्णांसाठी ‘हायपरबेरिक आॅक्सिजन थेरपी’ वरदान ठरते. याला लक्षात घेऊनच २०१० मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) १ कोटी २० लाख रुपये किमतीचे हे यंत्र खरदी केले. मेडिकलच्या शल्यक्रिया विभागाच्या शस्त्रक्रिया गृह ‘ड’मधील एका खोलीत हे उपकरण बसविण्यात आले. गेल्या सहा वर्षांपासून रोज पाच ते सात रुग्णांवर उपचार केले जात होते. परंतु सहा महिन्यापूर्वी येथील तंत्रज्ञ निवृत्त होताच हे यंत्र बंद पडले.
रुग्णांना खासगी केंद्राकडे पाठविले जात आहे. विशेष म्हणजे, खासगीमध्ये एका ‘थेरपी’ची किमत दोन हजाराच्यावर आहे. मेडिकलमध्ये ही उपचारपद्धती बीपीएल व ज्येष्ठ नागरिकांसाठी नि:शुल्क होती. मात्र आता यंत्रच बंद पडल्याने गंभीर रुग्ण अडचणीत आले आहेत. यातील अनेकांवर अवयव कापण्याची वेळ आल्याचे बोलले जात आहे.

तंत्रज्ञाअभावी अनेक यंत्र धूळ खात
विदर्भच नव्हे तर छत्तीसगड, मध्यप्रदेश, तेलंगणा, आंधप्रदेश येथून रुग्ण नागपूरच्या मेडिकलमध्ये येतात. हजारो गरीब रुग्णांना चांगले उपचार मिळावे म्हणून शासनाने येथे कोट्यवधीची अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध करून दिली आहेत. मात्र ते हाताळणारे तंत्रज्ञच नसल्याने धूळखात पडले आहेत. यात कोट्यवधीच्या ‘हायपरबेरिक आॅक्सिजन’ उपकरणासोबतच ‘इको कार्डिओग्राफी, ईएमजी, एनसीव्ही, सीपीटीएस’ यासारखे अनेक यंत्र धूळ खात पडले आहेत. मेंदूमधील विद्युत लहरींच्या हालचाली समजण्यासाठी ईईजी यंत्र चार वर्षांपासून सायकॅट्रिक विभागात बंद स्थितीत आहे.