शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
2
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
3
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
4
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
5
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
6
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
7
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
8
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
9
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
10
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
11
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
12
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
13
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
14
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
15
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
16
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
17
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
18
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
19
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
20
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
Daily Top 2Weekly Top 5

चाचणीसाठी जादा शुल्क ; रिपोर्टही आठ दिवसांनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर जिल्ह्यात दररोज ६ ते ७ हजार कोराेनाबाधित आढळत आहेत. शहरात चार हजाराहून अधिक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर जिल्ह्यात दररोज ६ ते ७ हजार कोराेनाबाधित आढळत आहेत. शहरात चार हजाराहून अधिक बाधितांची भर पडत आहे. संक्रमणाची चेन ब्रेक करण्यासाठी काॅन्टॅक्ट ट्रेसिंग वेळीच होणे गरजेचे आहे. यासाठी बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची कोरोना चाचणी होणे आवश्यक आहे. परंतु मागील तीन दिवस महापालिकेच्या केंद्रावर आरटीपीसीआर चाचण्या बंद होत्या. खासगी लॅबमध्ये चाचणीसाठी अवाच्या सवा शुल्क आकारले जात आहे. त्यात चाचणीचा रिपोर्ट मिळण्यास सहा ते आठ दिवसांचा कालावधी लागत असल्याने वेगाने वाढणाऱ्या संक्रमणाला आळा कसा बसणाार? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

खासगी रुग्णालयांत चाचणीसाठी शुल्क निर्धारित करण्यात आले आहे. मात्र त्यासाठी खासगी रुग्णालयांकडून लूट सुरू आहे. आरटीपीसीआर चाचणीसाठी ७५० रुपये घेणे अपेक्षित असताना ४ ते ५ हजार रुपये शुल्क आकारले जात आहे. ॲन्टिजेन चाचणीचा अहवाल त्याचदिवशी मिळणे अपेक्षित आहे. परंतु यासाठीही दुसऱ्या दिवसाची प्रतीक्षा करावी लागते. आरटीपीसीआर चाचणीच्या रिपोर्टला ६ ते ८ दिवस लागत आहेत. या कालावधीत रुग्णावर उपचारही करता येत नाहीत. अशा परिस्थितीत रुग्ण गंभीर आजारी पडल्यास, कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह, असा प्रश्न पडतो. याचा विचार करता, आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्ट दुसऱ्या दिवशी मिळाल्यास संबंधित रुग्णावर उपचार करणे सोयीचे होईल. परंतु महापालिका प्रशासनही हतबल दिसत आहे.

.....

सुविधा निर्माण करण्याची गरज

संशयित रुग्णांनी चाचणी केल्यानंतर २४ तासात रिपोर्ट मिळावा, यासाठी प्रयोगशाळांची संख्या वाढविण्याची गरज आहे. शहरात दररोज २० हजाराहून अधिक चाचण्या होत आहेत. त्या प्रमाणात प्रयोगशाळा निर्माण करण्यासाठी प्रशासनाने युध्दपातळीवर प्रयत्न करणे आवश्यक आहे. परंतु दुर्दैवाने असे दिसत नाही. वाढत्या रुग्णांपुढे प्रशासनही हतबल दिसत आहे.

...

गृह विलगीकरणातील रुग्ण वाऱ्यावर

गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ४० हजारांच्या आसपास आहे. या रुग्णांची औषधासाठी भटकंती सुरू आहे. मनपा प्रशासनाकडून औषध पुरवठा केला जात नाही. त्यांची साधी विचारपूसही केली जात नाही. विलगीकरणातील रुग्ण औषधासाठी भटकंती करीत असल्याने यातूनही संक्रमणाचा धोका वाढला आहे. उपचार मिळत नसल्याने विलगीकरणातील अनेक रुग्णांचा मृत्यूही झाला आहे.