शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

हजारो वर्षे हक्कापासून वंचित ठेवल्याची भरपाई करा :सुखदेव थोरात यांचे परखड मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 23:31 IST

बहुजन समाजाची नुकसान भरपाई करावी, देशातील भेदभाव मिटवावा व मगच आरक्षणाला विरोध करावा, असे परखड मत युजीसीचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देभेदभाव मिटवा, मगच आरक्षणाचा विरोध करा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशामध्ये अस्पृश्य वर्गावर २००० हजार वर्षापासून अत्याचार झाले. दलित व बहुजन समाजाला जमिन, उद्योगधंदे व शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले. म्हणून ते भूमिहिन, अशिक्षित व उद्योगधंद्याविना राहिले व याचा लाभ उच्च वर्गाने घेतला. त्यामुळे या बहुजन समाजाची नुकसान भरपाई करावी, देशातील भेदभाव मिटवावा व मगच आरक्षणाला विरोध करावा, असे परखड मत युजीसीचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी व्यक्त केले.बॅरिस्टर राजाभाउ खोब्रागडे प्रतिष्ठान आणि आवाज इंडिया टीव्ही यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आरक्षण : इतिहास, प्रासंगिकता व भविष्य’ या विषयावर बॅ. राजाभाउ खोब्रागडे सभागृह, टेका नाका येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर धनवटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एस. चंगोले, आवाज इंडिया टीव्हीचे संचालक अमन कांबळे, राजाभाउ खोब्रागडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खोब्रागडे, भीमराव वैद्य, प्रितम बुलकुंदे उपस्थित होते. डॉ. थोरात पुढे म्हणाले, भारतामध्ये आजही प्रचंड असमानता आहे, बहुजन समाजातील कोट्यावधी लोकांना समान संधी नाकारल्या जात आहेत. देशामधे असलेला भेदभाव मिटावा, सर्वांना समान संधी प्राप्त व्हावी यासाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली होती. जगातील १०० पेक्षा अधिक देशांमध्ये अफर्मिटीव्ह अ‍ॅक्शन अंतर्गत आरक्षण देण्यात येते पण भारतामध्ये मात्र आरक्षणाला विरोध केला जातो, ही शोकांतिका असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. हजारों वर्ष या देशातील बहुजन समाजाला शिक्षण, सम्पत्ति, जमीन आदि अनेक मूलभूत अधिकार नाकारण्यात आले. त्याची नुकसान भरपाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. अमेरिकेत या धोरनाची चर्चा सुरु आहे. यामध्ये जमीन वाटप, उद्योगधंद्यांचे वाटप आणि शैक्षणिक विकास आदी सुविधांचा समावेश असावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.यावेळी डॉ. चंगोले यांनी सम्राट अशोक, शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या काळात देश सुजलाम सुफलाम असल्याचे सांगत बहुजन शासकांच्या काळातच जनता सुखी राहते, असे विचार व्यक्त केले. अमन कांबळे यांनी विद्यापीठांचे कुलगुरू, न्यायपालिका किंवा प्रशासनाच्या वरिष्ठ स्तरावर विशिष्ट वर्गालाच प्राधान्य का दिले जाते, असा सवाल करीत समान संधीचा पुरस्कार केला.आरक्षणामुळे गुणवत्ता घटते हा खोटा प्रचारआरक्षण दिल्यामुळे गुणवत्ता कमी होते, असा आक्षेप घेतला जातो. हा केवळ खोटा प्रचार नसून हे एक षडयंत्र असल्याची टीका डॉ. थोरात यांनी केली. दिल्ली विद्यापीठाच्या प्राध्यापिका अश्विनी देशपांडे यांनी भारतीय रेल्वेमध्ये अनुसूचित जाती-जमातीच्या अधिकारी, कर्मचारी तसेच उच्चवर्णिय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर संशोधन केले. त्यांनी विविध संशोधन आणि इंडिकेटर्सच्या माध्यमातून त्यांनी आरक्षणामुळे गुणवत्ता कमी होत नाही, उलट ती बाढते असा निष्कर्ष दिला. आरक्षण विरोधकांनी या सर्व बाबींचा प्रामाणिकपणे अभ्यास करावा, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :reservationआरक्षणnagpurनागपूर