शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

किणी टोल नाक्यावर चकमक, राजस्थानचे दोन गुंड जखमी-दोन्ही बाजूने गोळीबार; पुणे-बंगलोर महामार्गावर थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 01:19 IST

कोल्हापूर : राजस्थानमधून महाराष्ट्रात पळून आलेल्या गुंडांच्या कारला पुणे-बंगलोर महामार्गावर अडविले असता त्यांनी कोल्हापूर पोलिसांवर बेछूटपणे गोळीबार करीत पळून ...

ठळक मुद्देदोघेही जमिनीवर कोसळल्यानंतर झडप टाकून त्यांना पकडले. कारचालक श्रीराम बैष्णोई यालाही पकडण्यात आले.मंगळवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास हा थरार सुरू झाला. दहा मिनिटे दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता.

कोल्हापूर : राजस्थानमधून महाराष्ट्रात पळून आलेल्या गुंडांच्या कारला पुणे-बंगलोर महामार्गावर अडविले असता त्यांनी कोल्हापूरपोलिसांवर बेछूटपणे गोळीबार करीत पळून जाण्याचा प्रयत्न केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोघे गुंड गंभीर जखमी झाले. शामलाल गोवर्धन बैष्णोई (वय २२, रा. जोधपूर), श्रवणकुमार मनोहरलाल मांजू-बैष्णोई (२४, रा. विष्णुनगर, बारखी, ता. आसिया, जि. जोधपूर) अशी त्यांची नावे आहेत.

त्यांना शिताफीने पकडून कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. कारचालक श्रीराम पांचाराम बैष्णोई (२३, रा. बेटलाईन जोधपूर) याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडे पोलीस मुख्यालयातील स्थानिक गुन्हे शाखेच्या कक्षामध्ये रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. मंगळवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास हा थरार सुरू झाला. दहा मिनिटे दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता.

राजस्थानच्या जोधपूर शहरामध्ये शामलाल बैष्णोई, श्रवणकुमार मांजू-बैष्णोई व श्रीराम बैष्णोई हे कुख्यात गुंड आहेत. त्यांची याठिकाणी मोठी दहशत आहे. खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, लूटमार, खंडणी यासारखे गंभीर गुन्हे त्यांच्यावर आहेत. काही सिने अभिनेते, व्यापारी, प्रशासकीय अधिकाऱ्यांसह पोलिसांना ठार मारण्याची धमकी देत होते. जोधपूर जिल्ह्यातील काही हत्याकांडांमध्येही या गुंडांचा समावेश आहे. अनेक वर्षांपासून तिघेही पसार होते. मंगळवारी सकाळी ते कारमधून कर्नाटकातील हुबळीहून निघाले. राजस्थान पोलिसांनी ही माहिती बेळगाव पोलिसांना दिली.

बेळगाव पोलिसांनी त्यांच्या कारला अडविण्याचा प्रयत्न केला असता तेथील पोलिसांना चकवा देत ते कोल्हापूरच्या दिशेने आले. बेळगाव पोलिसांनी ही माहिती कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना दिली. देशमुख यांनी किणी टोलनाक्यावर नाकाबंदी करण्याच्या सूचना केल्या. टोलनाक्यावर पोलिसांची नाकाबंदी सुरू असल्याचे समजताच कारचालक श्रीराम बैष्णोई भांबावून गेला. कार मागे वळविण्याचा प्रयत्न करीत असतानाच पाठीमागे पोलिसांची गाडी दिसताच त्याने दुस-या लेनमधून कार पुढे घेण्याचा प्रयत्न केला असता ती दुभाजकावर आदळली.

पोलिसांनी समोर व पाठीमागून घेराव घातल्याचे लक्षात आल्यानंतर कारमधून शामलाल बैष्णोई व श्रवणकुमार मांजू-बैष्णोई हे दोघेही दरवाजा उघडून बाहेर पडले. पोलीस त्यांना पकडण्यासाठी पुढे येताच त्यांच्या दिशेने शामलालने रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केला. क्षणाचाही विलंब न करता पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल त्यांच्या दिशेने गोळीबार केला. शामलाल बेछूटपणे गोळीबार करीत शेतवडीच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना त्याच्या दोन्ही पायांवर व श्रवणकुमारच्या डाव्या पायावर गोळीबार करून जखमी केले. दोघेही जमिनीवर कोसळल्यानंतर झडप टाकून त्यांना पकडले. कारचालक श्रीराम बैष्णोई यालाही पकडण्यात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिसtollplazaटोलनाकाhighwayमहामार्ग