शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

'सध्या रावसाहेब दानवेच प्रदेशाध्यक्षपदी राहणार'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2019 4:00 PM

'भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष हे प्रदेशाध्यक्षपदाचा अंतिम निर्णय घेतील'

मुंबई : महाराष्ट्रातील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. त्यामुळे त्यांच्याजागी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा कोण सांभाळणार, याबाबत सध्या राज्यात चर्चा सुरु आहे. प्रदेशाध्यपदासाठी चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, गिरीश महाजन यांच्या नावाची चर्चा जोरात आहे. दरम्यान, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष हे प्रदेशाध्यक्षपदाचा अंतिम निर्णय घेतील. त्यामुळे तूर्तास रावसाहेब दानवेच प्रदेशाध्यक्षपदी राहणार असल्याचे भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 

चंद्रकांत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची सुद्धा गृहमंत्रीपदी नियुक्ती झाली आहे. त्यामुळे आधी राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा निर्णय घेण्यात येईल. त्यानंतर राज्यातील प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे सध्या रावसाहेब दानवेच प्रदेशाध्यक्षपदी राहतील. या पदासाठी माझ्या नावाची सध्या चर्चा असली तरी अंतिम निर्णय हा राष्ट्रीय अध्यक्ष घेतील, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 

याचबरोबर, लोकसभा निवडणुकीसंदर्भात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी बारामतीचा अंदाज चुकल्याचे स्पष्ट केले. निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातील जागांबाबत विश्वास होता, मात्र बारामतीचा अंदाज चुकला. मात्र शरद पवार घराण्याची दमछाक करण्यास आम्हाला यश आले, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. 

याशिवाय, राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सध्या विचार सुरु आहे. याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील. तसेच, विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेसोबतचा असलेला जागावाटबाबतचा फॉर्म्युला बदलणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. देशाचे गृहमंत्री अमित शहा कोल्हापूरचे जावई आहेत. त्यांमुळे त्यांचे कोल्हापुरात जंगी स्वागत करणार असल्याचेही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.    

टॅग्स :BJPभाजपाRaosaheb Danweरावसाहेब दानवेchandrakant patilचंद्रकांत पाटीलMaharashtraमहाराष्ट्र