शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
3
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
4
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
5
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
7
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
10
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
11
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
12
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
13
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
14
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
15
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
16
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
17
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
19
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
20
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप

'राज्यघटनेचा अनादर करून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 8:27 AM

महाराष्ट्रात शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी सहमती दर्शविली असली

मुंबई - राज्यातील सत्तापेचावर तोडगा काढण्यासाठी काँग्रेसचे राज्य प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल आणि ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी मुंबईत शरद पवार यांच्यासह दोन्ही पक्षांच्या नेत्यांशी एकत्र चर्चा केली. त्यावेळी, महाराष्ट्रात लागू झालेल्या राष्ट्रपती राजवटीवरुनकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी राज्यपालांना लक्ष्य केलं. 

महाराष्ट्रात शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी सहमती दर्शविली असली, तरी याबाबतची घोषणा दिल्लीतून होणार आहे, शिवाय मुख्यमंत्रिपद शिवसेनेला देण्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीत सहमती झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शिका व राज्यघटनेचा अनादर करून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. राज्यपालांनी काँग्रेसला आमंत्रित न करणे हे चुकीचे आणि घटनाबाह्य आहे, असा आरोप अहमद पटेल यांनी केला आहे. 

महाशिवआघाडीच्या सरकारमध्ये काँग्रेसने सहभागी झाले पाहिजे, असा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धरला. राज्याला स्थिर सरकार द्यायचे असेल तर ते काँग्रेसच्या सहभागाशिवाय शक्य नसल्याचे त्यांनी पटवून दिले. तसेच मंत्रिपदांचे वाटप, किमान समान कार्यक्रम यावर चर्चा झाली. त्यानंतर खा. पवार यांनी उद्धव ठाकरे यांना बैठकीतील निर्णयाची माहिती दिली. शिवसेनेने राज्यात सरकार स्थापन करण्याबाबत 11 नोव्हेंबर रोजी अधिकृत प्रस्ताव दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांना दिला. मात्र, एवढ्या महत्त्वाच्या विषयांवर निर्णय घेण्याआधी काही मुद्द्यांवर अधिक चर्चेची गरज आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी यांचे एकमत झाल्यानंतरच सरकार स्थापन करण्याबाबतचा सविस्तर निर्णय जाहीर केला जाईल, असे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

दरम्यान, भाजप-शिवसेनेला संधी देऊनही सरकार स्थापन करण्याचा दावा करता आला नाही. दिलेल्या मुदतीत राष्ट्रवादीलाही ते शक्य नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे केली आणि राष्ट्रपतींनी त्यावर सायंकाळी शिक्कामोर्तब केले. त्यामुळे राज्यात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राष्ट्रवादीला मंगळवारी रात्री 8.30 वाजेपर्यंतची वेळ दिली होती. मात्र, मंगळवारी दुपारीच राष्ट्रवादीने अवधी वाढवून देण्याची विनंती राज्यपालांकडे केली. राज्यपालांनी त्यास नकार दिला. सरकार स्थापन करण्यात याप्रकारे तिन्ही पक्ष अपयशी ठरल्याने राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस राष्ट्रपतींकडे केली. केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर राष्ट्रपती राजवटीच्या आदेशावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली. 

टॅग्स :BJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसSharad Pawarशरद पवारPresident Ruleराष्ट्रपती राजवट