शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
2
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
3
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
4
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
5
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
6
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
7
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
8
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
9
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
10
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
11
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
12
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
13
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
14
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
15
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
16
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
17
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
18
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
19
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
20
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पाऊस, तरी टंचाईचे ढग

By admin | Updated: July 16, 2014 03:36 IST

मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार बरसणाऱ्या पावसाने तलाव क्षेत्रात खाते उघडले असले तरी या रिपरिपीमुळे जेमतेम दोन ते तीन हजार दशलक्ष लीटर जलसाठा वाढला आहे़

मुंबई : मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार बरसणाऱ्या पावसाने तलाव क्षेत्रात खाते उघडले असले तरी या रिपरिपीमुळे जेमतेम दोन ते तीन हजार दशलक्ष लीटर जलसाठा वाढला आहे़ ही वाढ नगण्य असून, पाण्याची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे़ त्यामुळे मुंबईवर पाणी टंचाईचे ढग कायम आहेत. पर्यायी जलस्रोत निर्माण करण्याचे पालिकेचे प्रयत्नही सपशेल फेल गेल्याने पाणीकपात २० टक्क्यांवरून ३० टक्क्यांपर्यंत वाढविण्यात येणार आहे़
मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये १३ लाख दशलक्ष लीटर पाणीसाठा असणे आवश्यक आहे़ मात्र अद्याप तलावांमध्ये ९९ हजार दशलक्ष लीटर जलसाठा आहे़ गतवर्षी जुलैच्या पंधरवड्यात तलावांमध्ये आठ लाख दशलक्ष लीटर साठा जमा झाला होता़ पावसाने अद्याप तलाव क्षेत्रात जोरही धरलेला नाही़ त्यामुळे मुंबईकरांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे़
२ जुलै रोजी पालिकेने २० टक्के पाणीकपात लागू केली होती़ तलाव क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यास ही कपात मागे घेण्याचे आश्वासनही प्रशासनाने दिले होते़ परंतु, आजच्या घडीला ३१ जुलैपर्यंतचा पाणीसाठा तलावांमध्ये असल्यामुळे आणखी १० टक्के पाणीकपात लागू करण्याचा प्रस्ताव तयार होत आहे़ याबाबतची अधिकृत घोषणा बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे़
मालाड पूर्व येथील पठाणवाडी भागात गेले काही दिवस अपुरा पाणीपुरवठा होत आहे़ याबाबत पी उत्तर विभाग कार्यालयाकडे तक्रार करण्यात आली होती़ परंतु अधिकाऱ्यांनी या प्रकरणी कानावर हात ठेवले़ तर गेले आठवडाभर या ठिकाणी पाणीच बंद झाले़ यामुळे त्रस्त रहिवाशांनी याविरोधात रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाला दणका दिला़ सकाळी वर्दळीच्या वेळीच रहिवासी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. (प्रतिनिधी)