शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: दहावीचा शेवटचा पेपर कधी?; शिक्षण विभागानं दिली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 22:53 IST

नववी आणि अकरावीच्या परीक्षांबद्दलचा निर्णय १५ एप्रिलनंतर होणार

मुंबई: महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा उर्वरित भूगोलाचा पेपर आता थेट 15 एप्रिलनंतर होणार असल्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाकडून निर्गमित करण्यात आल्या आहेत. आधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या पेपर संदर्भात 31 मार्चनंतर निर्णय घेण्यात येईल असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र आता देशातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर हा पेपर 15 एप्रिलनंतर घेण्यात येईल असे शालेय शिक्षण विभागाच्या परिपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. 

याचसोबत राज्यातील नववी आणि अकरावीच्या परिक्षा संदर्भातही 31 मार्चनंतर निर्णय घेण्यात येणार होता मात्र या बाबतीतही आता 15 एप्रिलनंतरच निर्णय घेण्यात येईल असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे पुढील वर्षी दहावी आणि बारावीला बसणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांच्या चिंतेत भर पडली आहे. विद्यार्थी परीक्षा कधी देणार आणि पुढील वर्षीच्या अभ्यासाला सुरुवात कधी करणार या चिंतेने पालक अनेक प्रश्न उपस्थित करू लागले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित तेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असला तरी 15 एप्रिलनंतर शिक्षण विभाग या परीक्षासंदर्भात नेमका काय निर्णय घेणार याकडे आता त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. 

शिक्षकांना दहावी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी घरी घेऊन जाण्याची परवानगी शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे. मात्र कोरोनाचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव व संचारबंदीमुळे सध्या बरेचसे शिक्षक गावी गेले आहेत. तर अनेक शिक्षकांना घराच्या बाहेर लांबचा प्रवास करणे अशक्यच आहे. यामुळे 15 एप्रिलनंतर लॉकडाऊन शिथिल झाल्या नंतर शिक्षकांना उत्तरपत्रिका तपासणीसाठी घरी घेऊन जाता येतील असे निर्देश उपसचिव राजेंद्र पवार यांनी परिपत्रकाद्वारे दिले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसssc examदहावी