शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

CoronaVirus: दहावीचा शेवटचा पेपर कधी?; शिक्षण विभागानं दिली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 10:53 PM

नववी आणि अकरावीच्या परीक्षांबद्दलचा निर्णय १५ एप्रिलनंतर होणार

मुंबई: महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा उर्वरित भूगोलाचा पेपर आता थेट 15 एप्रिलनंतर होणार असल्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाकडून निर्गमित करण्यात आल्या आहेत. आधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या पेपर संदर्भात 31 मार्चनंतर निर्णय घेण्यात येईल असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र आता देशातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर हा पेपर 15 एप्रिलनंतर घेण्यात येईल असे शालेय शिक्षण विभागाच्या परिपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. 

याचसोबत राज्यातील नववी आणि अकरावीच्या परिक्षा संदर्भातही 31 मार्चनंतर निर्णय घेण्यात येणार होता मात्र या बाबतीतही आता 15 एप्रिलनंतरच निर्णय घेण्यात येईल असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे पुढील वर्षी दहावी आणि बारावीला बसणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांच्या चिंतेत भर पडली आहे. विद्यार्थी परीक्षा कधी देणार आणि पुढील वर्षीच्या अभ्यासाला सुरुवात कधी करणार या चिंतेने पालक अनेक प्रश्न उपस्थित करू लागले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित तेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असला तरी 15 एप्रिलनंतर शिक्षण विभाग या परीक्षासंदर्भात नेमका काय निर्णय घेणार याकडे आता त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. 

शिक्षकांना दहावी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी घरी घेऊन जाण्याची परवानगी शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे. मात्र कोरोनाचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव व संचारबंदीमुळे सध्या बरेचसे शिक्षक गावी गेले आहेत. तर अनेक शिक्षकांना घराच्या बाहेर लांबचा प्रवास करणे अशक्यच आहे. यामुळे 15 एप्रिलनंतर लॉकडाऊन शिथिल झाल्या नंतर शिक्षकांना उत्तरपत्रिका तपासणीसाठी घरी घेऊन जाता येतील असे निर्देश उपसचिव राजेंद्र पवार यांनी परिपत्रकाद्वारे दिले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसssc examदहावी