शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

रुपांशू गणवीरचा यशाचा चौकार

By admin | Updated: June 20, 2014 01:09 IST

स्पर्धेच्या युगात आव्हानांना सामोरे जाण्यासाठी केवळ अभ्यासच नव्हे तर योग्य मार्गदर्शनाची देखील तितकीच आवश्यकता असते. मार्गदर्शनाला योग्य प्रेरणा आणि प्रयत्नांची जोड मिळाली

बहिणीच्या मार्गदर्शनातून सापडली ‘आयआयटी’ची ‘किल्ली’नागपूर : स्पर्धेच्या युगात आव्हानांना सामोरे जाण्यासाठी केवळ अभ्यासच नव्हे तर योग्य मार्गदर्शनाची देखील तितकीच आवश्यकता असते. मार्गदर्शनाला योग्य प्रेरणा आणि प्रयत्नांची जोड मिळाली तर शिखराला गवसणी सहज घालता येते. हीच बाब ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’मध्ये मागासवर्गीयांमधून प्रथम येऊन देशात नागपूरचे नाव उंचावणाऱ्या व शिवाजी सायन्सचा विद्यार्थी असलेल्या रुपांशू गणवीरच्या संदर्भात सत्यात उतरली आहे. अगदी शालेय जीवनापासून ते आता ‘आयआयटी’च्या प्रवेश वाटेपर्यंत त्याला थोरली बहीण सुरभी हिने सातत्याने प्रोत्साहन दिले. विशेष म्हणजे सुरभी हिने नुकतेच ‘आयआयटी-हैदराबाद’ येथून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे.रुपांशू गणवीर याने ‘जेईई-मेन्स’या परीक्षेत उपराजधानीतून प्रथम स्थान पटकाविले होते अन् आता ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’मध्ये देशपातळीवर २४ वा क्रमांक मिळवून त्याने ‘डबल’ यश मिळविले आहे. त्याच्या यशात सर्वात जास्त वाटा आहे तो त्याचा थोरल्या बहिणीचा. ‘आयआयटी’त प्रवेश मिळविण्यासाठी कशाप्रकारे अन् किती खोलात जाऊन अभ्यास करावा लागतो याची जाणीव तिने रुपांशूला आठव्या वर्गातच करून दिली होती. ती स्वत: हैदराबादमध्ये शिक्षणाला असली तरी सातत्याने ती फोन व इंटरनेटच्या माध्यमातून रुपांशूला मार्गदर्शन करीत होती. अभ्यास करणे तर रुपांशूच्या हातातच होते, परंतु त्याला प्रोत्साहन देण्याचे महत्त्वाचे काम सुरभीने केले. ‘जेईई-मेन्स’चा निकाल लागल्यानंतर सुरभी रुपांशूसोबत सातत्याने होती. गुरुवारी निकाल लागल्यानंतर रुपांशूला सर्वात पहिला पेढा सुरभीनेच भरविला. माझ्या वेळेस मला मार्गदर्शन करणारे कुणी नव्हते. परंतु रुपांशूच्या बौद्धिक क्षमतेवर आम्हाला विश्वास होता. मी केवळ त्याला प्रोत्साहन दिले, असे मत सुरभी गणवीर हिने व्यक्त केले. रुपांशूचे वडील सूरज गणवीर हे अमरावती येथे ‘एमएसईडीसीएल’मध्ये अभियंता पदावर कार्यरत आहेत तर त्याची आई गृहिणी आहे.रुपांशूने ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’मध्ये यश मिळविले असले तरी ‘आयआयटी’च्या अगोदरच देशातील नामवंत संस्थांमध्ये त्याचा प्रवेश निश्चित झाला होता. अकरावीत असतानाच ‘आयआयएससी-बेंगळुरू’ (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स) येथे प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ‘केव्हीपीआय’च्या (किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना) परीक्षेत त्याने देशपातळीवर ३२ वा क्रमांक पटकाविला होता. ‘बिट्स-पिलानी’ येथे प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या परीक्षेतदेखील त्याने ४५० पैकी ४२७ गुण मिळविले. बारावीच्या परीक्षेत त्याला ९५.२ टक्के गुण मिळाले. आता ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’च्या रूपात त्याने यशाचा चौकार मारला आहे.‘आयआयटी-पवई’ हेच लक्ष्य सुरुवातीपासून माझे लक्ष्य ‘आयआयटी-पवई’ हेच होते. दहावीनंतर लगेच तयारीला लागलो होतो. नियमित सराव व मुद्देसूद अभ्यास यातून पेपर सोडविणे सोपे गेले. माझ्या ताईने मला सातत्याने प्रोत्साहन दिले. याशिवाय माझ्या आई-वडिलांनीदेखील माझ्यावर विश्वास टाकला. दोन वर्षे सातत्याने ‘अभ्यास एके अभ्यास’च सुरू होते व आता मेहनत फळाला आल्याचे समाधान आहे असे मत रुपांशूने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. ‘आयआयटीत’ संगणक विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन पदवी मिळाल्यानंतर गणित विषयात संशोधन करण्याचा रुपांशूचा मानस आहे. माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम हे त्याचे आदर्श असून त्यांच्याशी भेट घेण्याची संधीदेखील त्याला शालेय जीवनात मिळाली होती. विशेष म्हणजे रुपांशू मागासवर्गीयांमधून देशात प्रथम आला असला तरी ‘आयआयटी-पवई’ येथे तो खुल्या प्रवर्गातूनच प्रवेश घेणार आहे. रुपांशू याने आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र आॅलिम्पियाडमध्ये भारतातून पाचवे स्थान पटकाविले होते. त्याची थोरली बहीण ‘आयआयटी’तूनच अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण घेत आहे. (प्रतिनिधी)