शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री, आमच्यासाठी फडणवीसच सर्वस्व; गणेश नाईकांचे ठाण्यात सूचक वक्तव्य
2
पाकिस्तान, पाकिस्तानसारखा खेळला! विजयासाठी आयर्लंडसमोर टाकाव्या लागल्या धापा
3
सीईटीची साईट क्रॅश, प्रचंड मनस्ताप; नागपूरचे साैम्या दीक्षित व पार्थ असाटी यांना १०० टक्के
4
पाकिस्तानची विझण्यापूर्वीची फडफड! गोलंदाजांना सूर गवसला, पण क्षेत्ररक्षणात गचाळपणा दिसला 
5
काँग्रेसला इतक्या जागा कशा मिळाल्या? चौकशी व्हावी, राहुल गांधींवर रामदास आठवलेंचा पलटवार
6
'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
7
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
8
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
9
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
10
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 9:36 PM

Madhya Pradesh Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठीचं मतदान आटोपल्यानंतर मध्य प्रदेशमध्ये भाजपाने (BJP) आपल्या आमदारांकडून अहवाल मागवला आहे. ज्या मतदारसंघात कमी मतदान झालं आहे, त्याचं कारणही तेथील आमदारांना विचारण्यात आलं आहे.

लोकसभा निवडणुकीसाठीचं मतदान आटोपल्यानंतर मध्य प्रदेशमध्ये भाजपाने आपल्या आमदारांकडून अहवाल मागवला आहे. ज्या मतदारसंघात कमी मतदान झालं आहे, त्याचं कारणही तेथील आमदारांना विचारण्यात आलं आहे. आमदारांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पक्षनेतृत्व या अहवालाचा अभ्यास करणार आहे. २५ मे रोजी होणाऱ्या सहाव्या टप्प्यातील मतदान आटोपल्यानंतर किंवा ३० मे नंतर कधीही भाजपाच्या नेत्यांची बैठक बोलावली जाऊ शकते. या बैठकीसाठी मध्य प्रदेशचे निवडणूक प्रभारी डॉ. महेंद्र सिंह, सहप्रभारी सतीश उपाध्याय हेसुद्धा मध्य प्रदेशमध्ये येणार आहेत. 

प्रभारी, सहप्रभारी यांच्यासह मध्य प्रदेश भाजपाचे दिग्गज नेते या अहवालाचं अध्ययन करतील. मात्र ३० मे पर्यंत मुख्यमंत्री मोहन यादव आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा निवडणूक प्रचारासाठी इतर राज्यांमध्ये असतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील भाजपाच्या अर्ध्या आमदारांनी अहवाल सादर केला आहे. जे निवडणूक प्रचारासाठी गेलेले आहेत, त्यांच्या अहवालाची वाट पाहिली जात आहे. आमदारांकडून मिळणारा अहवाल आणि पक्षाने तयार केलेला अहवाल यांची पडताळणी केली जाईल. तसेच त्या आधारावर आमदारांचं आकलन होईल, तसेच त्यामधून त्यांचं राजकीय भविष्य निर्धारित केलं जाईल. 

भाजपाने आमदारांकडून माहिती मागवलेले आठ प्रश्न पुढीलप्रमाणे आहेत१) आमदारांच्या मतदारसंघात मतदानाची टक्केवारी कशी होती?२)मतदान केंद्रनिहाय मतदानाच्या टक्केवारीची स्थिती कशी होती.३) कुठल्या मतदान केंद्रावर मागच्या निवडणुकीच्या तुलनेत ३७० मतं अधिक पडली. ४)जिथे कमी मतदान झालंय, त्याचा पक्षाच्या सकारात्मक निकालावर किती परिणाम होईल?५)मतदानाची टक्केवारी कमी होण्याचं मूळ कारण काय आहे? ६) आमदारांनी मतदान वाढवण्यासाठी काय प्रयत्न केले?७) पक्षाच्या कुठल्या नेत्याने खूप मेहनत घेतली आणि कुणी केवळ औपचारिकता पूर्ण केली.८) प्रचारादरम्यान आमदार ग्रामीण भागात किती रात्री वास्तव्याला राहिले?

दरम्यान, भाजपाने आमदारांकडे मागवलेल्या या अहवालावर काँग्रेसने टीका केली आहे. भाजपाला फिडबॅक घेण्याची काय गरज आहे. निवडणूक आयोगापासू सगळी व्यवस्था त्यांचीच आहे, असा टोला काँग्रेसने लगावला आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्या संगीता शर्मा म्हणाल्या की, अजून काही उरलं तर ईव्हीएम सेट केली जाते. मात्र एवढं सारं करूनही भाजपा फिडबॅक घेत असेल तर त्यांना वास्तव समजलं आहे, आपला पराभव होणार हे त्यांना कळून चुकलंय. त्यांनी जे लक्ष्य समोर ठेवलं होतं, त्यापेक्षा ते खूप मागे राहिले आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे

टॅग्स :madhya pradesh lok sabha election 2024मध्यप्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेस