शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
4
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
5
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
6
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
7
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
8
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
9
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
10
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
11
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
12
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
13
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
14
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
15
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
16
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
17
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
18
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
19
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
20
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : राहुल गांधी यांनी मैदान सोडले : अमित शहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 16:28 IST

लोकशाहीत विरोधी पक्ष महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रातील निवडणूक महत्त्वाची असताना काँग्रेस पक्ष पळ काढत आहे. राहुल गांधी हे मैदान सोडून बाहेर गेले आहेत. त्यांनी उमेदवारांच्या पाठीशी ठाम उभे राहणे गरजेचे होते. त्यांनी आत्ताच पराभव मान्य केला आहे, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी येथे केली.

ठळक मुद्देनिवडणूक महत्त्वाची असताना राहुल गांधी यांनी मैदान सोडले : अमित शहाकोल्हापूर विमानतळावर भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत

कोल्हापूर : लोकशाहीत विरोधी पक्ष महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रातील निवडणूक महत्त्वाची असताना काँग्रेस पक्ष पळ काढत आहे. राहुल गांधी हे मैदान सोडून बाहेर गेले आहेत. त्यांनी उमेदवारांच्या पाठीशी ठाम उभे राहणे गरजेचे होते. त्यांनी आत्ताच पराभव मान्य केला आहे, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी येथे केली.जत (जि. सांगली) येथील सभेला जाण्यासाठी कोल्हापूर विमानतळावर सकाळी सव्वा अकराच्या सुमारास गृहमंत्री शहा आले. त्यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा करताना त्यांनी कोल्हापूरमधील मतदारसंघांचा आढावा घेतला. त्यानंतर गृहमंत्री शहा म्हणाले, आम्ही त्रिपुरामध्ये मंडई आणि रस्त्यावर उभे राहून भाजपचे २५० सदस्य बनवले. त्यानंतर एक हजार लोकांची सभा घेतली.

त्रिपुरात सध्या भाजप सत्तेत आहे. महाराष्ट्रात महायुतीचे २२० हून अधिक उमेदवार निवडून येतील. दरम्यान, गृहमंत्री शहा यांचे विमानतळावर आगमन होताच भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव यांनी पुष्पगुच्छ त्यांचे स्वागत केले.

यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, भाजपा प्रदेश सरचिटणीस सुरेश हाळवणकर, प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक, ग्रामीण जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, भाजपा सरचिटणीस विजय जाधव, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, आदी उपस्थित होते.कोल्हापूरमध्ये सभा घेण्याचा प्रयत्न करुराज्यात अनेक ठिकाणी या आठवड्यात सभांचे नियोजन असल्याने कोल्हापूरसाठी वेळ मिळणे अवघड आहे. शेवटच्या दोन दिवसात शक्य झाल्यास कोल्हापूरमध्ये सभा घेण्याचा प्रयत्न करु असे मंत्री शहा यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना सांगितले. पदाधिकाऱ्यांसमवेत संवाद साधल्यानंतर खासगी हेलिकॉप्टरने जतच्या दिशेने ते निघून गेले. शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विमानतळ परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात होता.ज्यादा जागा मिळायला हव्या होत्याजिल्ह्यातील बंडखोर उमेदवार आणि ते कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवित आहेत ते गृहमंत्री शहा यांनी जाणून घेतले. कोल्हापुरात कॉँग्रेसकडून अद्याप मोठी प्रचार सभा झाली नसल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी देताच शहा यांनी काँग्रेसवर टीका केली.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे कोल्हापूर जिल्हा पिंजून काढत असल्याचे राहूल चिकोडे यांनी सांगितले. भाजपला कोल्हापूर जिल्ह्यात ज्यादा जागा मिळायला हव्या होत्या, अशी अपेक्षा महेश जाधव यांनी व्यक्त केली. आई अंबाबाईचा आशीर्वाद घेण्यासाठी पुन्हा कोल्हापूर मध्ये येण्याची विनंती जाधव यांनी केली.

 

टॅग्स :Amit Shahअमित शहाBJPभाजपाkolhapurकोल्हापूर