शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
4
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
5
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
6
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
7
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
8
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
9
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
10
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
11
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
12
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
13
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
14
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
15
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
16
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
17
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
18
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
19
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
20
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
Daily Top 2Weekly Top 5

कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 19:44 IST

कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कलिंगड साठले; शेतकरी आणि विक्रेता झाला हवालदिल

कल्याण : मुंबईत एका कुटुंबाने बिर्याणी सेवनानंतर कलिंगड खाल्ले. त्यानंतर कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर कलिंगड विक्रेता आणि शेतकरी यांना मोठा फटका बसला आहे. कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत लाखो रुपायांचा माल चार दिवसापासून पडून आहे. कलिंगडाच्या खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याने शेतकरी आणि विक्रेते हवालदिल झाले आहे. त्यांचा माल सडल्याने तो फेकून देण्याची वेळ आली आहे. 

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत रोज कोट्यावधी रुपयांची फळांचा आवक होत असते. विविध प्रकारची फले बाजारात घाऊक विक्रीसाठी येतात. त्यात चिकू, आंबा, जांभळे, सफरचंद, केळी, डाळिंब, फणस, अननस, पेरु आदी फळे येतात. सध्या उन्हाळा असल्याने उन्हाची काहिली मिटवण्यासाठी कलिंगडाला ग्राहकांची जास्त पसंती आहे. बाजारात १० ते १२ ट्रक कलिंगडाचा माल विक्रीसाठी आला आहे. मुंबईतील घटनेनंतर कलिंगड खाण्याकडे ग्राहकांनी पाठ फिरविली आहे. घाऊक आणि किरकोळ बाजारात कलिंगडाच्या मालाला उठाव नाही. त्यामुळे कलिंगडाचा माल पडून आहे. 

गेल्या चार दिवसापासून हा माल ट्रकमध्ये पडून असल्याने त्यापैकी काही माल खराब होत आहे. मुंबईतील घटना होण्यापूर्वी किरकोळ बाजारात कलिगंड ५० रुपये किलो दराने विकले जात होते. लहान आकाराच्या कलिंगडाला ५० रुपये किलोचा भाव होता. बड्या आकाराच्या कलिंगडाला ८० ते १०० रुपये किलो दराचा भाव होता. घाऊक बाजारात कलिगंड विकले जात होते. दूरवरून कलिंगडचा माल घेऊन आलेले ट्रक चालक हवाल दिल झाले आहे. मालाला उठाव नसल्याने मालाचा उत्पादन खर्च तसेच वाहतूकीचा खर्च देखील निघणार नाही. त्यामुळे गाडीचा हप्ता कुठून भरायचा असा प्रश्न वाहन चालकांना सतावित आहेत. 

उन्हाळ्यात कलिंगडाचा माल मोठ्या प्रमाणात विकला जाईल. चार पैसै शेतकरी आणि विक्रेत्यांना मिळतील अशी मोठी आशा शेतकरी आणि विक्रेत्यांना होती. त्या आशेवर आत्ता पाणी फिरले आहे. मुंबईतील घटनेनंतर कलिंगड खाण्याविषयी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अन्न व औषध प्रशासनाने मुंबईत झालेले मृत्यू हे कलिंगड खाल्ल्याने झालेले नाहीत असा निर्वाळा दिला आहे. तसेच वैद्यकीय तज्ज्ञांनीही नागरिकांनी न घाबरता फळांचा आस्वाद घ्यावा असे म्हटले आहे. तरी देखील नागरीकांच्या मनातील भिती जात नसल्याने त्याचा फटका कलिंगड विक्रेते आणि शेतकरी यांना बसला आहे.

टॅग्स :kalyanकल्याण