शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

सरकार पाठीत खंजीर खुपसतंय, तुम्ही नांगर फिरवा; उद्धव ठाकरे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 15:41 IST

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मराठवाडा दौरा करीत आहेत.

डोंगरकडा (जि.हिंगोली) : आश्वासन देऊन देखील संपूर्ण कर्जमाफी न देणारे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसत आहे. पण, तुमच्यातही नांगर फिरविण्याची हिंमत आहे, हे लक्षात ठेवा आणि सरकारवर नांगर फिरवा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे शेतकऱ्यांना केले.

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मराठवाडा दौरा करीत आहेत. ७ नोव्हेंबर रोजी त्यांनी कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, हे सरकार रजाकारापेक्षाही वाईट वागत आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती होत नाही, तोपर्यंत महायुतीला मत नाही. दगाबाज सरकारला तुम्ही दगा द्या. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती आणि लोकशाहीतील मत चोरी या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी थेट सरकारला आव्हान दिले आहे. जे मी घरी बसून केले ते त्यांनी लोकांमध्ये फिरवून करावे. भाजप सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, असेच सांगितले होते, पण आता योग्य वेळी कर्जमुक्ती करू, अशी भाषा सरकार वापरत आहे. त्यामुळे तुम्हीही असेच सांगा की योग्य वेळी आम्ही मतदान करू, असे आवाहन ठाकरे यांनी केले.

एकजुटीने धडा शिकवामत चोरीचा मुद्दा उपस्थित करत ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. दुबार आणि तीबार मतदारांची नोंद झाल्याचे सांगून मत चोरी करून हे सरकार सत्तेत आल्याचा गंभीर आरोप केला. ते म्हणाले, जे लोक मत चोरी करून आले आहेत आणि दगाबाजी करून कारभार करत आहेत, त्यांना शेतकऱ्यांनी एकजुटीने धडा शिकवावा, असे आवाहन ठाकरे यांनी केले.  

यावेळी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, बबनराव थोरात, खासदार नागेश आष्टीकर, हिंगोली जिल्हाप्रमुख गोपू पाटील, संदेश देशमुख, शेतकरी नेते पराग अडकिणे, बाळासाहेब गावंडे यांच्यासह जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपल्या समस्यांच्या पाढा वाचला.

English
हिंदी सारांश
Web Title : Betrayed by government, revolt! Thackeray urges farmers to overthrow them.

Web Summary : Uddhav Thackeray accuses the government of deceiving farmers on loan waivers. He urged farmers to unite and overthrow the 'betrayer government' due to unfulfilled promises and alleged electoral fraud, demanding complete loan waivers.
टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाFarmerशेतकरीMarathwadaमराठवाडाAgriculture Sectorशेती क्षेत्र