उन्हाळ्याला सुरूवात होवून महिनाभराचा कालावधी लोटला मात्र जि.प.पाणी पुरवठा विभाग आणि जिल्हा प्रशासनाने पाणी टंचाई निवारणार्थ उपाय योजना करण्याकडे दुर्लक्ष केल्याने जिल्हावासीयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड देण्याची पाळी आली आहे. ...
तालुक्यात पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस उग्र रुप धारण करीत आहे. जिल्हा प्रशासनाच्या नियोजनाच्या अभावामुळे सडक अर्जुनी तालुक्यातील नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. मात्र प्रशासनाच्या उपाय योजना कागदावरच असल्याचे चित्र आह ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातंर्गत वैद्यकीय शिक्षण संशोधन केंद्र(डीएमईआर) अंतर्गत केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय आणि बाई गंगाबाई महिला रुग्णालयात कार्यरत ६० परिचारीकांना मागील पाच महिन्यापासून वेतन न मिळाल्याने आर्थिक कोंडी झाली आहे. ...
शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा यासाठी जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या एकूण १०० धान खरेदी केंद्रावरुन धान खरेदी केली जाते. यंदा आदिवासी विकास महामंडळाने एकूण ९ लाख ३६ हजार क्विंटल धान खरेदी केली. ...
गोंदिया जिल्ह्यात धान पिकाची स्थिती चांगली असताना मागील दोन दिवसापासून असलेले ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचा धानाला फटका असून शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला जाण्याची शक्यता आहे. ...
सडक अर्जुनी तालुक्यातील राका ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या राकाटोला येथे भीषण पाणी टंचाई आहे. भल्या पहाटेपासूनच महिलांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. मात्र याकडे जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष झाले असल्याने गावकऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे. ...
आरोग्य सेवा व आरोग्यासंदर्भात असलेल्या योजनांचा फायदा गोंदिया जिल्हावासीयांना देण्यात जिल्ह्याचा आरोग्य विभाग यशस्वी ठरला आहे. विविध कामात उत्तम कामगीरी बजावल्यामुळे जिल्ह्याचा आरोग्य विभाग आघाडीवर आहे. ...
येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयाला जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी एम.राजा दयानिधी यांनी मंगळवारी (दि.१६) आकस्मिक भेट दिली. तसेच रुग्णालयाच्या परिसराची व स्वच्छता व्यवस्थेची पाहणी केली. ...
मेडीकल कौन्सील आॅफ इंडिया (एमसीआय) च्या एका चमूने मंगळवारी (दि.१६) गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे निरीक्षण केले. ही चमू निरीक्षणानंतर आपला अहवाल केंद्रीय मेडीकल बोर्डाला सोपविणार आहे. ...
जिल्ह्यात मागील वर्षी सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्पात केवळ २५ टक्के पाणीसाठा आहे. याचा परिणाम भूजल पातळीवर झाला असून जिल्ह्यातील १४६ गाव आणि वाड्यातील गावकऱ्यांना भर उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. ...