शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

ये दिल कशाला मांगे मोअर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 10:08 IST

गडकरी म्हणतात, हवे ते मिळत नाही.  ‘आणखी’चा हव्यास सुटत नाही; पण नाराजीच्या या साखळ्या राजकारण्यांइतक्याच सामान्यांच्याही गळ्यात असतातच!

दिनकर रायकर - समन्वयक संपादक, लोकमत

केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. आपल्याला जे पटते, जे वाटते, ते कुणाचाही मुलाहिजा न ठेवता स्पष्टपणे बोलून टाकणारा मोकळाढाकळा वैदर्भीय राजकारणी म्हणजे नितीन गडकरी, अशी त्यांची ख्याती आहे.गडकरी जसे सभेत बोलतात, तितकेच कामातूनही बोलतात. राज्यात आणि केंद्रातही त्यांच्या कामगिरीशी अपवादानेच कुणाची तुलना होऊ शकेल. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात गडकरींनी राजकीय नेत्यांच्या ‘असमाधानी वृत्तीबद्दल’ परखड भाष्य केले. प्रत्येक पक्षात, प्रत्येक राजकारणी असमाधानी आहे. मंत्रिपद नाही म्हणून आमदार नाराज, चांगले मंत्रिपद नाही म्हणून मंत्री नाराज, मुख्यमंत्रीपद नाही म्हणून चांगले मंत्री नाराज, अशी ही नाराजीची साखळी त्यांनी मांडली. या सगळ्या असमाधानी व्यवस्थेचे ते प्रत्यक्षदर्शी असल्यामुळे त्यांचे भाषण आणखी रंगले, हे काही वेगळे सांगायला नकोच. ‘आहे त्यात समाधान माना, चांगले काम करा, सुखी व्हाल’ असा मोलाचा सल्लाही त्यांनी जाताजाता सगळ्यांना दिला. गडकरींना सगळेच मनापासून ऐकतात; पण त्यांचे विचार आचरणात आणत नाहीत, त्यासाठी ते कचरतात, हे राजकीय नेत्यांचे आणि सध्याच्या राजकारणाचेही दुर्दैव. गडकरींच्या म्हणण्याप्रमाणे राजकारण्यांनी अपेक्षांचे आणि महत्त्वाकांक्षांचे ओझे उतरून ठेवून कामाला सुरुवात केली आणि आपल्यावरील जबाबदारीला न्याय दिला, तर या देशात आणि राज्यातही काय बहर येईल ! विकासाचे किती प्रकल्प मार्गी लागतील! कामे कशी झपाट्याने होतील!!- पण असे काही होत नाही. ‘ये दिल मांगे मोअर’च्या जमान्यात समाधानी म्हणावा, असा एकही नाही. सत्ता आणि अधिकारपदाचे नाट्य ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत सगळीकडे सारख्याच ईर्ष्येने सुरू असते. महत्त्वाकांक्षांची यादी काही केल्या संपत नाही. हवे आहे ते मिळत नाही आणि ‘आणखी’चा हव्यास तर काही केल्या सुटत नाही. मुदलातच समाधान नसले तर जनकल्याण कसे होणार? त्यामुळे सध्याच्या बहुतेक सगळ्या समस्यांचे मूळ कशात असेल, तर ते राजकीय नेतृत्वाच्या असमाधानात. - गडकरींच्या या कानपिचक्या सध्याच्या सर्वपक्षीय राजकीय नेतृत्वाला आहेत, हे खरेच. आता राजकारणी लोकांना त्यांच्यातलाच कुणी शालजोडीतले देतो, तेव्हा श्रोतृवृंदाकडून टाळ्या वाजणे साहजिक आहे; पण गडकरी जे बोलले ते फक्त राजकीय व्यक्तिमत्त्वांनाच लागू होते, असे मुळीच नाही. ते सामान्य माणसासाठीही तितकेच लागू आहे. मोठे घर, मोठी गाडी, आणखी मोठा पगार, दागदागिने, जमीन जुमला, बढत्या, पदे, मुलांची शिक्षणे, त्यांचा डामडौल अशी ही यादी लांबत जाते. ‘स्टेटस मेंटेन’ करणे हे व्यक्तिसापेक्ष आहे, याचा विसर पडतो आणि सुरू होतो तो मृगजळाचा हव्यास. या हव्यासातून, जे हाती आहे त्याचाही उपभोग घेता येत नाही आणि असलेल्या जबाबदारीलाही धड न्याय देता येत नाही. हव्यासाच्या मागे धावणाऱ्या प्रत्येकाच्या मनात उरतात ती नैराश्याची आणि असमाधानाची कधीही न संपणारी जळमटे. ही निराशा टाळण्यासाठी सोपा उपाय गडकरींनीच आपल्या भाषणात सांगितला आहे. ते म्हणतात तसे, ‘मिळाले आहे त्यात समाधान माना, खांद्यावर असलेल्या जबाबदारीला न्याय द्या आणि उत्तम काम करा;’  पण ते लक्षात घेतले पाहिजे. समजून घेतले पाहिजे आणि आचरणात आणले पाहिजे. - ‘सर्वपक्षीय नेत्यांना गडकरींच्या कोपरखळ्या’ एवढाच त्याचा अर्थ नाही. थोडी जबाबदारी जनतेनेही घ्यावी. थोडे आचरण सामान्यजनांनीही करावे. आपला देश आणि आपले राज्य नक्कीच पुढे जाईल. सगळेच राजकारण्यांवर ढकलायला हवे, असे थोडेच आहे?

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीPoliticsराजकारणBJPभाजपा