शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

विशेष लेख: ...आता स्पष्ट बोलायची वेळ आली आहे! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 07:32 IST

राजकीय फायद्यासाठी सत्तेच्या गैरवापराला मुभा देणाऱ्या दडपणाविरुद्ध न्यायपालिका ठामपणे उभी राहिली तरच हे प्रजासत्ताक बळकट होऊ शकेल.

-कपिल सिब्बल (राज्यसभा खासदार, ज्येष्ठ विधिज्ञ)
संधी आणि संसाधनांची दारे केवळ मूठभर भाग्यवंतांसाठी नव्हेत तर वंचितांसाठीही उघडली पाहिजेत हा संकल्प आपल्या राज्यघटनेचा मूलाधार आहे. केवळ न्यायपूर्ण राजकीय व्यवस्था साकारण्याचाच नव्हे तर त्याहून मूलभूत महत्त्वाचा असा सामाजिक आणि आर्थिक समतेचा मार्गही आपल्या राज्यघटनेने आखून दिलेला आहे. त्यासाठीच समाजात उपलब्ध असलेली संसाधने काही ठरावीक लोकांच्या हातात एकवटू नयेत याची दक्षता घेणारे निर्देश राज्यधोरणांच्या मार्गदर्शक तत्त्वांत नमूद केले आहेत.

१९५० साली अनेक संकटे देशासमोर आ वासून उभी होती. देशातील केवळ १८ टक्के लोक साक्षर होते. राष्ट्राला भक्कम औद्योगिक पाया नव्हता. लोकसंख्येचा एक प्रचंड हिस्सा दारिद्रयरेषेखाली जगत होता. सामाजिक विषमता तर ठायीठायी होती. ब्रिटिशांनी संसाधने लुटून नेली होती. कामाचा भला मोठा डोंगरच समोर उभा होता. 

जवाहरलाल नेहरू या द्रष्ट्या पंतप्रधानांनी एका बलशाली आणि पुनर्घटित भारताचे स्वप्न पाहिले. आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कास धरणे हाच लोकांचे जीवन आणि त्यांचा दृष्टिकोन बदलण्याचा एकमेव मार्ग असल्याचे भान त्यांना होते. मोठमोठे वैज्ञानिक आणि औद्योगिक प्रकल्प उभे करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ हवे हे त्यांनी ताडले.

१९५० साली खरगपूर येथे पहिल्या आयआयटीची स्थापना केली. १९६१ उजाडेतो मुंबई, मद्रास, कानपूर आणि दिल्ली येथे आणखी चार आयआयटी उभ्या राहिल्या. अणुऊर्जा आयोग, भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्र, २२ राष्ट्रीय प्रयोगशाळांचे जाळे असलेले वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन मंडळ, उद्योजक भारतीय व्यवस्थापन संस्था (IIMS), वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन गतिमान करण्यासाठी AIIMS, भारतीय अवकाश संशोधन संस्था, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO), राष्ट्रीय अभिकल्प संस्था (NID), जीवन विमा महामंडळ (LIC) आणि भारतीय सांख्यिकी संस्था (ISI) अशा संस्था नेहरुंनीच उभारल्या.

नेहरूंच्या भविष्यवेधी दृष्टीमुळे आणि धोरणांमुळेच, आज राष्ट्रसमूहांत भारताला मानाचे स्थान लाभले आहे. नंतर आलेल्या शासनांनी, नेहरूंनी घडवलेली संस्थात्मक यंत्रणा अधिकाधिक मजबूत करण्याचाच प्रयत्न केला. पुढे स्वतःचे राखीव सोने गहाण ठेवण्याची वेळ देशावर आली तेव्हा मात्र तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव आणि त्यांचे अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी देशाची अर्थव्यवस्था खुली करण्याचा निर्णय घेतला. 

सार्वजनिक क्षेत्रातील आपली गुंतवणूक, अन्नसुरक्षा प्रदान करणारी हरित क्रांती आणि सामाजिक विषमतेसंदर्भात आमूलाग्र बदल घडवून आणणारे कायदे यामुळे देशाचे हितच झाले होते. अर्थव्यवस्था खुली झाल्यामुळे खासगी क्षेत्राला पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाची भूमिका बजावता आली. २०१४ नंतर मात्र हे सारेच पूर्णतः बदलले. त्याचे काही विपरीत परिणाम वाट्याला आले आहेत.

कणाहीन नोकरशहांनी या संस्थांची स्वायत्तता संपुष्टात आणण्यात हातभारच लावला आहे. निवडणूक आयोग, राज्यपाल आणि अन्य वैधानिक संस्थांचा यात समावेश आहे. विशिष्ट विचारसरणीकडे कल असलेल्या व्यक्तींचा भरणा होत असल्यामुळे आपल्या विद्यापीठांचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. 

अस्तित्वात असलेले काही कायदे दुरुस्त करण्यात आले असून, निर्वाचित लोकप्रतिनिधींना लक्ष्य करण्यासाठी त्याचा दुरुपयोग होत आहे. विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यातील मुख्यमंत्रीही यातून सुटलेले नाहीत.
मानवी भांडवल, संशोधन आणि विकास यात गुंतवणूक करणाऱ्या देशांनीच जागतिक राजकारणावर प्रभुत्व गाजवले असा इतिहासाचा दाखला आहे. 

गेली कित्येक वर्षे, इतिहासाच्या या धड्याकडे आपण दुर्लक्ष करत आहोत. आर्थिक दृष्ट्या बलाढ्य असणारा देशच अन्य देशांबरोबर सुयोग्य अटींनिशी परिणामकारक वाटाघाटी करू शकतो. हे सामर्थ्य नसले की काय होते ते आपण पाहतच आहोत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या देशावर अन्य कोणाहीपेक्षा जास्त आयात कर लादत असताना केवळ मूक साक्षीदार होणे आपल्याला भाग पडत आहे. 

ग्लोबल साउथचे नेतृत्व आपल्या हातून निसटल्याचे दिसते. शेजारी राष्ट्रांशी पूर्वीसारखे सलोख्याचे संबंध राखण्यातही आता भारत असमर्थ ठरतो आहे. वाढत्या बेरोजगारीमुळे तरुणांचे हात रिकामे राहात आहेत. आता आपण आपले प्राधान्यक्रम बदलण्याची वेळ आलेली आहे. स्पष्ट बोलण्याची वेळ येऊन ठेपली आहे. 

राजकीय फायद्यासाठी सत्तेच्या गैरवापराला मुभा देणाऱ्या कायद्याच्या दडपणाविरुद्ध न्यायपालिका ठामपणे उभी राहिली तरच हे प्रजासत्ताक बळकट होऊ शकेल. कोणत्याही प्रजासत्ताकाची शक्ती अंततः दोन अत्यावश्यक संस्थात्मक यंत्रणांवर अवलंबून असते -माध्यमे आणि न्यायदान यंत्रणा. याच यंत्रणांची कोंडी झाली तर प्रजासत्ताकाचे तेज लोप पावेल.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Time to speak clearly about India's current state and future.

Web Summary : Kapil Sibal critiques India's current trajectory, highlighting institutional erosion and economic missteps since 2014. He stresses the need to prioritize human capital, research, and development, and to safeguard the independence of the judiciary and media for a robust democracy.
टॅग्स :democracyलोकशाहीParliamentसंसदAmericaअमेरिकाCourtन्यायालयBJPभाजपाkapil sibalकपिल सिब्बल