शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
2
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
3
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
4
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
5
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
6
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
7
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
8
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
9
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
10
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
11
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
12
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
13
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
14
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
15
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
16
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
17
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
18
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
19
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
20
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
Daily Top 2Weekly Top 5

सव्वासहा कोटींच्या पुस्तकांचे वाटप संशयास्पद; घोटाळ्याचा वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 04:17 IST

बळीराजा चेतना योजनेतील निधीच्या गैरवापराचा आरोप

उस्मानाबाद : जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या बळीराजा चेतना योजनेतील निधीतून थोडथोडकी नव्हे तर तब्बल सव्वासहा कोटी रुपयांची पुस्तके शेतकऱ्यांना वाटल्याचा दावा प्रशासनाकडून केला गेला आहे़ मात्र, या पुस्तक वाटपावर फाईल बेपत्ता असल्याने संशयाचे ढग निर्माण झाले आहेत.

सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून उस्मानाबादमध्ये तत्कालीन राज्य सरकारने बळीराजा चेतना योजना राबविण्यास सुरुवात केली़ यासाठी दरवर्षी काही ठराविक निधी शासनाकडून मिळत होता़ दरम्यान, २०१७-१८ या आर्थिक वर्षात या योजनेसाठी ७ कोटी ५० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता़ बळीराजा चेतना अभियान समितीच्या बैैठकीत शेतकऱ्यांचे मनोबल उंचावून उत्पन्नात वाढ होण्यासाठी प्रशिक्षण व पूरक पुस्तके वाटप करण्याचा निर्णय झाला़ जिल्हाधिकाºयांनी २ फेब्रुवारी रोजी ही योजना राबविण्यासाठी ७़१९ कोटी रुपये ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालकांकडे वर्ग केले़ मात्र, त्यांनी असमर्थतता दर्शविल्याने जिल्हाधिकाºयांनी पालकमंत्र्यांना पत्राद्वारे ही बाब कळविली़ त्यांनतर त्यांच्या सूचनेप्रमाणे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे प्रशिक्षणाचे तर पुस्तक वाटपाचे काम तहसीलदारांमार्फत राबविण्याचे निश्चित करण्यात आले़ १६ फेब्रुवारीला रक्कम जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे वर्ग करण्यात आली़ त्यांच्यामार्फत १०२ प्रशिक्षण वर्ग घेऊन त्यात ७ हजार १२ शेतकºयांना सहभागी झाल्याचा दावा केला जात आहे़ त्यासाठी ९४ लाख रुपये खर्च झाले. उर्वरित ६ कोटी २५ लाख रुपये तहसीलदारांकडे वर्ग करण्यात आले़

सुजितसिंह ठाकूर : विभागीय चौकशी व्हावी
या प्रकरणाविषयी भाजप आ़सुजितसिंह ठाकूर यांनी विभागीय आयुक्तांकडे गुरुवारी तक्रार केली आहे़ या तक्रारीत त्यांनी पुस्तक खरेदीच्या प्रक्रियेविषयी व त्याच्या वाटपाविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत़ प्रकरण संशयास्पद असून, त्याची विभागीय चौकशी होण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे़

एकाच महिन्यात पुस्तके खरेदी करणे व ती वाटप करणे, याविषयी शंका घेतली जात आहे़ तक्रारीनंतर जिल्हाधिकाºयांनी जिल्हा परिषदेच्या सीईओमार्फत चौकशी लावली आहे़

टॅग्स :fraudधोकेबाजीFarmerशेतकरी