शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

कुऱ्हाडीने घाव घातले, धारदार हत्याराने गळे कापले, एकाच कुटुंबातील चार जणांची निर्घृण हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 19:03 IST

Crime News: एकाच कुटुंबातील चार जणांची गळा कापून हत्या करण्यात आली. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. मृतांमध्ये एका सहा वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे.

रांची - झारखंडमधील पश्चिम सिंहभूम जिल्ह्यात एक थरकाप उडवणारी घटना घडली आहे. जिल्ह्यातील हाटगम्हरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केनपोसी गावामध्ये एकाच कुटुंबातील चार जणांची गळा कापून हत्या करण्यात आली. (CrimeNews) ही घटना शुक्रवारी रात्री घडली. मृतांमध्ये एका सहा वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुन्हेगारांनी हे हत्याकांड घडवून आणले आहे. संपूर्ण कुटुंबाची हत्या करून गुन्हेगार गावामधून फरार झाले आहेत. गावापासून काही अंतरावर कुटुंबातील सर्व सदस्यांचे मृतदेह सापडले.  ग्रामस्थांनी सकाळी शेतामध्ये चार जणांचे मृतदेह पाहिले. त्यानंतर गावात खळबळ उडाली. पोलिसांना या घटनेची खबर त्वरित देण्यात आली. (Wounded with an ax, cut with a sharp knife, brutally murdered four members of the same family in Jharkhand)

मृतांची ओळख केनपोसी गावातील रहिवासी ओनामुनी खंडाईत (२६), त्यांची पत्नी मानी खंडाईत (२२), त्यांचा मुलगा मुगरू खंडाईत (६) तसेच भाऊ गोबरो खंडाईत (२२) अशी पटली हे. पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मृतदेहांना पाहून असे वाटते की, सर्वांची कुऱ्हाडीने कापून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. सर्वांच्या गळ्यावर धारदार हत्याराने वार केल्याच्या खुणा आढळल्या आहेत. मृतांमध्ये एका सहा वर्षीय बालकाचाही समावेश आहे. मात्र पोलिसांना घटनास्थळावरून कुठलेही हत्यार मिळाले नाही.

पोलिसांनी या प्रकरणी सध्या काहीही बोलण्यास नकार दिला आहे. या प्रकरणी तपास सुरू आहे. मृतदेह जप्त करून पोस्टमार्टमसाठी सदर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. तसेच ग्रामस्थही खूप काही बोलण्यास कचरत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJharkhandझारखंड