शहरं
Join us  
Trending Stories
1
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
2
Election Results 2026 LIVE: "बंगालच्या विकासासाठी भाजप आता कोणतीही कसर सोडणार नाही"; ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींची प्रतिक्रिया
3
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
4
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
5
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
6
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
7
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
8
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
9
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
10
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
11
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
12
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
13
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
14
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
15
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
16
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
17
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
18
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
19
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
20
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
Daily Top 2Weekly Top 5

सौरभची हत्या नसून 'वध' केलाय, आरोपी साहिलचा दावा; मर्डरचं तंत्र-मंत्र कनेक्शन काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 16:46 IST

ही मानसिक प्रवृत्ती अत्यंत धोकादायक असते. अशा व्यक्तींना कुठल्याही गुन्ह्याचा पश्चाताप होत नाही असं मानसोपचार तज्ज्ञ सांगतात.

लखनौ - मेरठ हत्याकांडाने संपूर्ण राज्य हादरलं आहे. पत्नी मुस्कान रस्तोगी हिने प्रियकर साहिल शुक्लाच्या मदतीने पतीची निर्दयी हत्या केली. त्यानंतर त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून सिमेंटमध्ये टाकून दिले. या घटनेत पोलिसांनी आरोपींना अटक केली असून त्यांच्या चौकशीत धक्कादायक सत्य उघडकीस येत आहे. ही हत्या नसून वध असल्याचा दावा आरोपीने करून गुन्ह्याचे समर्थन करण्याचा प्रयत्न होत आहे. जेव्हा एखादा गुन्हेगार गुन्ह्याचा हेतू नैतिक आणि धार्मिक सांगून ते योग्य असल्याचं सांगतो हे पहिल्यांदाच घडत नाही. ही मानसिक प्रवृत्ती फार जुनी आहे. 

गुन्हेगारी इतिहासात बऱ्याचदा काही गुन्हेगार स्वत: केलेले कृत्य योग्य ठरवण्यासाठी असा प्रयत्न करत असतात. पोलिसांनी सांगितले की, सौरभच्या हत्येतील आरोपी साहिल शुक्ला आणि मुस्कान सोबत नशा करत होते. इतकेच नाही साहिलचा तंत्र मंत्रावर विश्वास असायचा. तो त्याच्या मृत आईशी बोलायचा आणि ती त्याला आदेश करायची असंही त्याने जबाबात दावा केला. आरोपीची मानसिकता पाहिली तर तो समाजात काही तरी बदल घडवण्यासाठी गुन्हा घडवून आणतोय असं सांगण्याचा प्रयत्न करत आहे. 

ही मानसिक प्रवृत्ती अत्यंत धोकादायक असते. अशा व्यक्तींना कुठल्याही गुन्ह्याचा पश्चाताप होत नाही. याबाबत सायकोलॉजिस्ट डॉ. अनुजा कपूर सांगतात की, तंत्र-मंत्र या दोन वेगळ्या विधी आहे. परंतु तंत्र-मंत्राच्या नावाखाली गुन्हेगारीसाठी प्रवृत्त केले जाते. तंत्र मंत्र हा विधी असला तरी कुणाचाही वध करण्याची परवानगी देत नाही. गुन्हेगार स्वत: गुन्हा करतो आणि त्याने केलेले कृत्य योग्य ठरवण्यासाठी तंत्र-मंत्राला मानसिक प्रवृत्तीशी जोडतो असं त्यांनी सांगितले.

दरम्यान, जेव्हा एखादा व्यक्ती अंधविश्वासाला सामाजिक जबाबदारीपेक्षा जास्त मानतो तेव्हा तो गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त होतो. ही विकृत मानसिकता आहे. जिथे आपल्या इच्छेला तर्कहिन पद्धतीने गुन्ह्याशी जोडले जाते. याआधीही असे बरेच गुन्हे समोर आलेत. २००६ साली सुरिंदर कोहली याने मुलांची हत्या करून त्यांना खाल्लं होते, त्याने तंत्र मत्राचा हवाला देत त्याचे कृत्य बरोबर असल्याचा दावा केला होता. १९८० साली एक सिरियल किलर रस्त्यावर झोपणाऱ्यांची हत्या करायचा. तो स्वत:ला समाज सुधारक असल्याचं भासवत लोकांची हत्या करत होता. २०१७ साली एका व्यक्तीने त्याच्या आई बहिणीची हत्या केली होती. काली मातेने मला आदेश दिले होते असा दावा त्या आरोपीने केला होता.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी