शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेतही मतदारसंघांचे ‘औरंगाबाद’ नाव कायम; जुन्या नावानेच करावा लागणार प्रचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 18:37 IST

जुन्या नावानेच शहरी भागात करावा लागणार प्रचार

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर व धाराशिव जिल्ह्याचे नाव अनुक्रमे औरंगाबाद व उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ म्हणूनच राहिले. आता विधानसभा निवडणुकीतदेखील औरंगाबाद लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या औरंगाबाद पूर्व, औरंगाबाद पश्चिम आणि औरंगाबाद मध्य या तिन्ही मतदारसंघाचे नाव या निवडणुकीपुरते तरी कायम राहणार आहे.

महाराष्ट्र शासनाने औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही शहरांचे नामांतर केले. केंद्र सरकारने या नामांतराला मान्यता दिल्यानंतर दोन्ही जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव असे झाले. मात्र लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर व धाराशिव लोकसभा मतदारसंघ असे न होता, औरंगाबाद आणि उस्मानाबाद असाच उल्लेख झाला होता.

औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर झाले असले तरी विधानसभेसाठी शहरातील तिन्ही मतदारसंघांना जुनीच नावे वापरली जाणार आहेत. औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना होईपर्यंत दोन्ही मतदारसंघाचे नाव कायम राहणार आहे, असे आयोगाकडून लोकसभा निवडणुकीदरम्यान स्पष्ट करण्यात आले होते. शहरातील तिन्ही मतदारसंघांतील राजकीय पक्षांच्या उमेदवारांना मतदारसंघात प्रचार करताना औरंगाबाद पूर्व, पश्चिम, आणि मध्य मतदारसंघाचे उमदेवार म्हणावे लागणार आहे. उस्मानाबाद शहरातील मतदारसंघासाठीदेखील असाच उल्लेख करावा लागेल. आगामी काळात जनगणना होणार आहे. त्यानंतर मतदारसंघाची पुनर्रचना कार्यक्रम हाती घेतला जाईल. तोपर्यंत आयोगाच्या दप्तरी या दोन्ही जिल्ह्यांची व त्यांच्या अंतर्गत मतदारसंघाची नावे जुनीच असतील.

सध्या जुनीच नावे असतीलनिवडणूक आयोगाने मतदारसंघांबाबत आजवर जो पत्रव्यवहार केला आहे, त्यानुसार मतदारसंघांची नावे जुनीच असतील. त्या येणाऱ्या काळात काही बदल झाले तर निश्चितपणे कळविण्यात येईल.- दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर