शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत कंपनीने उगारला वीज खंडितचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:31 IST

विरली (बु.) : नुकतेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने सर्व थकीत वीजग्राहकांना नोटीस बजावून येत्या १५ दिवसांत वीज बिल ...

विरली (बु.) : नुकतेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने सर्व थकीत वीजग्राहकांना नोटीस बजावून येत्या १५ दिवसांत वीज बिल भरा अन्यथा वीजपुरवठा खंडित करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. या नोटिसांमुळे लाॅकडाऊन काळातील वीज बिल माफीची आशा मावळली असून, जनतेत शासनाविरुद्ध तीव्र असंतोष खदखदत आहे.

कोरोना संकटामुळे अपरिहार्य ठरलेल्या लाॅकडाऊनच्या काळात अनेकांचे रोजगार हिरावले गेले. परिणामी शासनाने जनतेला मोफत अन्नधान्य, कर्जाच्या हप्त्यांमध्ये सवलत अशा अनेक सुविधा दिल्या. त्याच पार्श्वभूमीवर शासन लाॅकडाऊनच्या काळातील वीज बिल माफ करील, अशी जनतेची रास्त अपेक्षा होती. मात्र, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने नुकत्याच बजावलेल्या नोटिसांमुळे जनतेची आशा धुळीस मिळाली. अनेक वीज ग्राहकांकडे मार्च २० पासूनची बिले थकीत आहेत. विद्युत वितरण कंपनीने दर महिन्याच्या थकीत बिलावर व्याज आकारल्यामुळे या बिलांची रक्कम आणखी फुगली आहे. काही शेतकऱ्यांच्या धानाची मोजणी झाली असली तरी त्यांचे चुकारे अद्याप मिळाले नाहीत; तर अनेक शेतकऱ्यांचे धान मोजणीच्या प्रतीक्षेत खरेदी केंद्रावर पडून आहे. अशा परिस्थितीत एवढे मोठे बिल एकाच वेळी कसे भरावे, असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

दरम्यान, शासनाने किमान लाॅकडाऊनच्या काळातील तीन-चार महिन्यांचे वीज बिल माफ करावे, अशी जनतेची मागणी आहे. विरली (बु.) वीज वितरण केंद्रांतर्गत परिसरातील २३ गावे येतात. ज्या ग्राहकांकडे पाच हजार वा त्यापेक्षा अधिक वीज बिल थकीत आहे, अशा सुमारे ५०० ग्राहकांना नोटीस बजावण्यात आली आहे.