शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील सर्व ६८६ शेतकऱ्यांना अनुदानित बियाण्यांची लॉटरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:25 IST

भंडारा : शेतकऱ्यांना सर्व योजनांचा एकत्रित लाभ देण्यासाठी कृषी विभागातर्फे महाडीबीटी पोर्टलवर संगणक प्रणाली विकसित केली आहे. या पोर्टल ...

भंडारा : शेतकऱ्यांना सर्व योजनांचा एकत्रित लाभ देण्यासाठी कृषी विभागातर्फे महाडीबीटी पोर्टलवर संगणक प्रणाली विकसित केली आहे. या पोर्टल मार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदानित बियाण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. याची अंतिम मुदत २४ मे पर्यंत होती. जिल्ह्यातील ६८६ शेतकऱ्यांनी भात,तूर पिकाच्या अनुदानित बियाण्यासाठी कृषी विभागाकडे ऑनलाईन अर्ज केले होते. यापैकी सर्वच शेतकऱ्यांना अनुदानित बियाण्याची लॉटरी लागली आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत भात, तूर पिकाचे बियाणे अनुदानावर उपलब्ध होणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांना प्रत्येक तालुकास्तरावर कृषी सहाय्यक मार्फत बियाण्याचे परमिट दिले जाणार आहे. यावर्षी शेतकऱ्यांना प्रथमच राज्यस्तरावरून ऑनलाईन सोडत पद्धतीने सवलतीच्या दरात बियाणे मिळणार आहे. कृषी विभागाकडून राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत ही योजना राबवली जात आहे.

बॉक्स

अनुदानावर मिळणार बियाणे

शेतकऱ्यांना खरीप हंगामात अधिक दराने बियाणे खरेदी करावे लागत होती. त्यामुळे यावर्षी कृषी विभागाने शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात बियाणे उपलब्ध व्हावे, यासाठी महाडीबीटी पोर्टल मार्फत ऑनलाईन अर्ज मागविले होते. आता अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची राज्यस्तरावर सोडत काढण्यात आली असून शेतकऱ्यांना बियाण्यांचे परमिट वाटप केले जाणार आहे.

कोट

१) खरीप हंगामासाठी अनुदानावर बियाणे मिळणार म्हणून मे महिन्यात ऑनलाईन अर्ज भरला होता. मात्र यावेळी अनेकदा अडचण आली. त्यानंतर दोन दिवसांनी अर्ज मंजूर झाला. आता बियाण्यासाठी लॉटरीत नंबर लागला आहे. त्यामुळे सवलतीच्या दरात बियाणे मला मिळेल याचा आनंदच आहे. कोरोनात तेवढेच चार पैशाची बचत होईल.

दीपक कावळे, शेतकरी, चिखली

कोट

२)खरीप हंगाम जवळ आला असून मशागतीची कामे सुरू केली आहेत. बाजारात अनेक कंपनीच्या महागड्या बियाण्यांची खरेदी करण्यापेक्षा मी कृषी विभागातर्फे मिळणारे अनुदानित बियाण्यासह मी घरचेच बियाणे पेरणार आहे. मात्र शासनाने कृषी विभागाच्या सर्वच योजना ऑफलाईन राबवायला हव्यात.

दीपक खंडागळे, शेतकरी, दाभा.

कोट

३) मी कृषी विभागाच्या अनुदानित बियाण्यासह यांत्रिकीकरण योजनेसाठी अर्ज भरला होता. त्यानंतर आता अनुदानित बियाण्यासाठी नंबर लागल्याचा संदेश आला आहे. बियाणे मिळणार आहे, मात्र मला यांत्रिकीकरण योजनेचा संदेश मात्र अजूनही आलेला नाही. कृषिमंत्र्यांनी व राज्य सरकारने सर्व योजना ऑफलाईन जिल्हास्तरावर राबवायला हव्या.

हरिहर मदनकर, शेतकरी, सिरसी