शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
2
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
3
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
4
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
5
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
6
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
7
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
8
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
9
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
10
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
11
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
12
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
13
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
14
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
15
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
16
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
17
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
18
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
19
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
20
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतील आंदोलनातील सहभागी सर्व भामटेच

By | Updated: December 7, 2020 04:14 IST

अहमदनगर : दिल्लीत आंदोलन करण्यासाठी जे लोक गोळा झाले आहेत, हे सर्व भामटे लोक आहेत. दिल्लीचे आंदोलन म्हणजे दुसरे ...

अहमदनगर : दिल्लीत आंदोलन करण्यासाठी जे लोक गोळा झाले आहेत, हे सर्व भामटे लोक आहेत. दिल्लीचे आंदोलन म्हणजे दुसरे शाहीनबागच सुरू झाले आहे, अशी घणाघाती टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली. एकाने कायदे करायचे आणि दुसऱ्याने विरोध करायचा, अशीच कॉंग्रेस व भाजपाची धोरणे असल्याने दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याची टीकाही पाटील यांनी केली.

शेतकरी संघटनेची जनप्रबोधन यात्रा रविवारी नगरमध्ये आली होती. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत पंजाब, हरियाणासह देशातील इतर भागांतील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाबाबत शंका उपस्थित करीत पाटील म्हणाले, दिल्लीचे आंदोलन हे फसवून आणलेल्या शेतकऱ्यांचे आहे. शेतकऱ्यांपेक्षा तेथे आडते, हमाल असेच लोक अधिक आहेत. त्यामुळे हे आंदोलन शेतकऱ्यांचे आंदोलन मानत नाही. वन्यप्राणी संरक्षण कायदा, गोवंश हत्याबंदी कायदा, जमीन अधिग्रहण कायदा याबाबतीत आंदोलक काही बोलत नाहीत. शेतकऱ्यांना खरा त्रास ज्या कायद्यापासून आहे, त्या कायद्यांचा उच्चारसुद्धा या आंदोलनात झालेला नाही.

आजच्यासारखे कायदे २००६ ला मनमोहन सिंग यांनी केले, तेव्हा भाजपने विरोध केला. आज भाजप कायदे करीत आहे, तर काँग्रेस विरोध करीत आहे. काँग्रेस आणि भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हेच दिसून येते. देशात ७० वर्षे काँग्रेसची राजवट होती. त्यांनी शेतमालाची निर्यातबंदी उठविली नाही. वाजपेयी सरकारनेही निर्यातबंदी उठविली नाही की, नरेंद्र मोदी यांनीही निर्यातबंदी उठविली नाही. भाजप व काँग्रेस या दोघांची आर्थिक धोरणे एकच आहेत. हे फक्त मतांच्या राजकारणासाठी सुरू आहे.