शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गंभीर गुन्ह्यातील शिक्षेचे प्रमाण तिपटीने वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 05:00 IST

गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यात लॉकडाऊन आहे. या काळात संचारबंदीचे उल्लंघन करणाºया व्यक्तींविरुद्ध कलम १८८ अन्वये गुन्हे नोंदविले गेले. ही प्रकरणे प्रलंबित न ठेवता लगेच न्यायालयात सादर केली गेली. न्यायालयांनीही तातडीने हे खटले निकाली काढले. त्यात तब्बल ३७४ जणांना शिक्षा झाली. दंड म्हणून त्यांच्याकडून चार लाख ९५ हजार ४०० रुपयांची रक्कम वसूल केली गेली.

ठळक मुद्देयवतमाळ जिल्हा : शिक्षेचा दर ५२.८५ टक्के, स्थानिक गुन्ह्यांमध्ये ३८.९० टक्के शिक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : काही वर्षांपूर्वी अवघा १५ टक्के असलेला गंभीर गुन्ह्यांच्या न्यायालयीन खटल्यातील शिक्षेचा दर आता तिपटीने वाढून ५२.८५ टक्क्यावर पोहोचला आहे. पोलिसांचा काटेकोर तपास व पंच-साक्षीदारांच्या पाठपुराव्याचे हे फलित मानले जाते.एकेकाळी जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यात शिक्षेचे प्रमाण अवघे ५ टक्के होते. नंतर एसडीपीओ स्तरावर विधी अधिकारी व प्रत्येक न्यायालयामध्ये पैरवी अधिकारी नियुक्त केले गेले. त्यामुळे २०१५ मध्ये भादंविच्या गुन्ह्यातील शिक्षेचे प्रमाण १५.४५ टक्क्यांवर पोहोचले. त्यात प्रत्येक वर्षी वाढ होत गेली. २०२० मध्ये ३० जून अखेर हे प्रमाण ५२.८५ टक्के झाले. १ जून २०१७ ला यवतमाळ येथील जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झालेल्या एम. राज कुमार यांनी न्यायालयीन खटल्यांमध्ये शिक्षेचे प्रमाण वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. त्यासाठी प्रत्येक आठवड्याला आढावा घेतला जातो, या आठवड्यात कोणती केस बोर्डावर लागणार, त्यातील गुन्हा साबित होण्याच्या दृष्टीने महत्वाचे पैलू काय, पंच-साक्षीदार कोण याच्यावर फोकस निर्माण केला जातो. महत्वपूर्ण पंच-साक्षीदाराला विश्वासात घेऊन न्यायालयातील उलट तपासणीच्या दृष्टीने भक्कम तयारी करून घेतली जाते. दाखल होणाऱ्या नव्या गुन्ह्यांमध्ये पंचनामा करताना काही त्रुटी राहणार नाही, याची खबरदारी घेतली जाते. स्थळ पंचनाम्याच्यावेळी तेथे सापडणाºया वस्तू रेकॉर्डवर घेऊन त्या माध्यमातून गुन्ह्याचा हेतू व आरोपीपर्यंत कनेक्टीव्हीटी निर्माण केली जाते. या साखळीतूनच गुन्हे सिद्ध होणे व त्यात न्यायालयाकडून शिक्षा ठोठावली जाण्याचे प्रमाण वाढले आहे. बोर्डावर आलेल्या जुन्या खटल्यांमध्ये सर्वाधिक फोकस पंच-साक्षीदारावर निर्माण केला जातो. पोलिसांच्या या सर्व परिश्रमांमुळेच २०१७ ला १९.९६ टक्के असलेले गंभीर गुन्ह्यातील शिक्षेचे प्रमाण आता तब्बल ५२.८५ टक्क्यावर पोहोचले आहे. गेल्या तीन वर्षात दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये भक्कम तपास करून दोषारोपपत्रे न्यायालयात सादर केली गेल्याने पुढील काही वर्ष गंभीर गुन्ह्यांमध्ये शिक्षेचे प्रमाण वाढतच राहणार असल्याचे सांगण्यात आले.आयपीसी वगळता आर्म्स अ‍ॅक्ट, दारू जुगारावरील कारवाई, इसी अ‍ॅक्ट या सारख्या विशेष स्थानिक कायद्यान्वये (एसएलएल) दाखल गुन्ह्यांमध्येसुद्धा २०१५ ला १८.८६ टक्के असलेले शिक्षेचे प्रमाण आता दुप्पटीने वाढून३८.९० टक्क्यावर पोहोचले आहे.लॉकडाऊन तोडणाºया ३७४ जणांना शिक्षागेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यात लॉकडाऊन आहे. या काळात संचारबंदीचे उल्लंघन करणाºया व्यक्तींविरुद्ध कलम १८८ अन्वये गुन्हे नोंदविले गेले. ही प्रकरणे प्रलंबित न ठेवता लगेच न्यायालयात सादर केली गेली. न्यायालयांनीही तातडीने हे खटले निकाली काढले. त्यात तब्बल ३७४ जणांना शिक्षा झाली. दंड म्हणून त्यांच्याकडून चार लाख ९५ हजार ४०० रुपयांची रक्कम वसूल केली गेली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस