शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

 पूल वाहून गेला; नाल्याच्या पाण्यातून शेतमालाची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2020 5:39 PM

The bridge was swept away पूल गेल्या अडीच वर्षांपूर्वी अतिवृष्टीमुळे वाहून गेला.

लोकमत न्युज नेटवर्कइंझोरी (वाशिम): मानोरा तालुक्यातील इंझोरी परिसरातील इंझोरी-पिंपळगाव या पाणंद रस्त्यावरील पूल गेल्या अडीच वर्षांपूर्वी अतिवृष्टीमुळे वाहून गेला. त्यामुळे ३०पेक्षा शेतकºयांची वहिवाटच अडचणीत आली असून, सोयाबीनसह इतर शेतमालाची काढणी केल्यानंतर नाल्यातील खाच खळग्यातून सायकलने किंवा डोक्यावर साहित्याची ने-आण करावी लागत आहे. तथापि, या पुलाची जबाबदारी असलेला पुनवर्सन विभागाने अद्याप (४ आॅक्टोबर) त्याची दखल घेऊन पुलाची दुरुस्ती केली नाही. मानोरा तालुक्यातील म्हसणी नजिक १९७२ मध्ये अडाण प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. त्यानंतर या प्रकल्पाकडे जाणाºया इंझोरी-पिंपळगाव दरम्यानच्या पाणंद रस्त्यावर नाल्याचे पाणी वाढल्याने हा रस्ता पाण्यात जाऊन शेतकºयांची वहिवाट बंद झाली. त्यामुळे या रस्त्यावर शेती असलेल्या इंझोरी येथील ३० पेक्षा अधिक शेतकºयांची पंचाईत झाली. वारंवार या समस्येकडे लक्ष वेधल्यानंतर या पाणंद रस्त्यावर पुनर्वसन विभागाने पुलाची उभारणी केली.  साधारण अडीचवर्षांपूर्वी अवकाळी पावसामुळे हा पूलच वाहून गेला. त्यामुळे शेतकºयांची वहिवाट बंद झाली. आता येथून कुठलीच वाहने नेता येत नाहीत, तर शेतात पायी जाण्यासाठीही शेतकरी, शेतमजूर महिलांना नाल्यात उतरून पाण्यात चालत जावे लागते. शिवाय इतर रस्त्यांची अवस्था वाईट असल्याने शेतकºयांना शेतात जावे कसे असा प्रश्न पडला आहे. आता शेतमाल काढणीनंतर शेतकºयांना शेतमाल घरी आणने कठीण झाले असून, नाल्याच्या  पाण्यातून शेतकरी सायकलने शेतमालाची वाहतूक करीत असल्याचे गंभीर चित्र येथे पाहायला मिळत आहे.  

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी