शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

ग्रामीण परिसरातून होतेय हंडासंस्कृती हद्दपार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2021 12:25 AM

प्लास्टिक कॅनचा वापर वाढला

अनिरुद्ध पाटील 

बोर्डी : पालघर जिल्हा हा शहरी, नागरी आणि डोंगराळ भाग असे जिल्ह्याचे स्वरूप आहे. पालघरमधून मुंबई, ठाणे, वसई-विरार, मीरा-भाईंदर या शहरांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र दरवर्षी जिल्ह्याच्या ग्रामीण भागांत पाणीटंचाईची समस्या निर्माण होते. यामुळे धरण उशाला आणि कोरड घशाला, अशी पालघरवासीयांची स्थिती दरवर्षी होत असते. 

जिल्ह्यातील डहाणू, विक्रमगड, मोखाडा, वाडा आदी तालुक्यांतील अनेक गावांना सध्या पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यात असलेल्या धरणांतील पाणी मुंबई, ठाणे, वसई-विरार, मीरा-भाईंदर या शहरांना पुरवले जाते. मात्र धरणांशेजारीच असलेल्या अनेक गावांना मात्र पाणी मिळत नाही, अशी स्थिती आहे. दरम्यान, डहाणू तालुक्यातील घोलवड गावातील मरवाडा या वस्तीतही पाणीटंचाई सुरू आहे. या ठिकाणी नळातील प्रवाहाचा दाब कमी असल्याने नागरिकांना तासनतास रांगेत थांबावे लागते. हंड्याने पाणी भरून घरापर्यंत नेताना, दिवसभरात वीस लिटरही भरले जात नाही. त्यामुळे प्लास्टिक ड्रमच्या वापराने हंडासंस्कृती हद्दपार होत आहे.

तालुक्यातील समुद्रकिनारी भागात जलस्त्रोतांचे पाणी मचूळ असून, उन्हाळ्यात हे प्रमाण वाढते. घोलवड ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा योजना राबवली आहे. मात्र ती सुरळीत नसल्याने एप्रिल, मे व जून महिन्यात टंचाई अधिक जाणवते. काही ठिकाणी जलवाहिनीला मोटारपंप जोडून होणाऱ्या पाणीचोरीने, प्रवाहाचा दाब कमी होतो, असे स्थानिक सांगतात. पाणी हंड्यात भरून पुन्हा रांगेत नंबर लावणे अशक्य होते. पुरवठा बंद करण्याच्या अंतिम टप्प्यात प्रवाहाचा दाब वाढल्यावर रांगेत लावलेले ड्रम भरले जातात. त्यानंतर सायकलीला ड्रम लावून वाहतूक केली जाते. पंधरा लिटरचा तेलाचा रिकामा प्लास्टिक ड्रम वापरला जातो. त्यातील पाण्याचा वापर शरीरास हानिकारक असला, तरी त्याकडे दुर्लक्ष करावे लागते, अशी व्यथा महिलांनी बोलून दाखवली.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारcorona virusकोरोना वायरस बातम्याWaterपाणी