शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण परिसरातून होतेय हंडासंस्कृती हद्दपार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 00:26 IST

प्लास्टिक कॅनचा वापर वाढला

अनिरुद्ध पाटील 

बोर्डी : पालघर जिल्हा हा शहरी, नागरी आणि डोंगराळ भाग असे जिल्ह्याचे स्वरूप आहे. पालघरमधून मुंबई, ठाणे, वसई-विरार, मीरा-भाईंदर या शहरांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र दरवर्षी जिल्ह्याच्या ग्रामीण भागांत पाणीटंचाईची समस्या निर्माण होते. यामुळे धरण उशाला आणि कोरड घशाला, अशी पालघरवासीयांची स्थिती दरवर्षी होत असते. 

जिल्ह्यातील डहाणू, विक्रमगड, मोखाडा, वाडा आदी तालुक्यांतील अनेक गावांना सध्या पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यात असलेल्या धरणांतील पाणी मुंबई, ठाणे, वसई-विरार, मीरा-भाईंदर या शहरांना पुरवले जाते. मात्र धरणांशेजारीच असलेल्या अनेक गावांना मात्र पाणी मिळत नाही, अशी स्थिती आहे. दरम्यान, डहाणू तालुक्यातील घोलवड गावातील मरवाडा या वस्तीतही पाणीटंचाई सुरू आहे. या ठिकाणी नळातील प्रवाहाचा दाब कमी असल्याने नागरिकांना तासनतास रांगेत थांबावे लागते. हंड्याने पाणी भरून घरापर्यंत नेताना, दिवसभरात वीस लिटरही भरले जात नाही. त्यामुळे प्लास्टिक ड्रमच्या वापराने हंडासंस्कृती हद्दपार होत आहे.

तालुक्यातील समुद्रकिनारी भागात जलस्त्रोतांचे पाणी मचूळ असून, उन्हाळ्यात हे प्रमाण वाढते. घोलवड ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा योजना राबवली आहे. मात्र ती सुरळीत नसल्याने एप्रिल, मे व जून महिन्यात टंचाई अधिक जाणवते. काही ठिकाणी जलवाहिनीला मोटारपंप जोडून होणाऱ्या पाणीचोरीने, प्रवाहाचा दाब कमी होतो, असे स्थानिक सांगतात. पाणी हंड्यात भरून पुन्हा रांगेत नंबर लावणे अशक्य होते. पुरवठा बंद करण्याच्या अंतिम टप्प्यात प्रवाहाचा दाब वाढल्यावर रांगेत लावलेले ड्रम भरले जातात. त्यानंतर सायकलीला ड्रम लावून वाहतूक केली जाते. पंधरा लिटरचा तेलाचा रिकामा प्लास्टिक ड्रम वापरला जातो. त्यातील पाण्याचा वापर शरीरास हानिकारक असला, तरी त्याकडे दुर्लक्ष करावे लागते, अशी व्यथा महिलांनी बोलून दाखवली.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारcorona virusकोरोना वायरस बातम्याWaterपाणी