शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : आर्थिक मंदीतून सावरणारी पायपीट...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 15:30 IST

Coronavirus : वाशीचे एपीएमसी मार्केट बंद असल्याने भाजीपाला, धान्य व विविध मालाची शहरात होणारी आवक घटली आहे.

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरं लॉकडाऊन झाली आहेत. त्यामुळे शहरातील सर्वच व्यवसाय उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. त्यामुळे मोठी आर्थिक मंदीची लाट येणार असल्याची प्रत्येकालाच जाणीव झाली आहे. त्यामुळे या मंदीतून सावरण्यासाठी काही भाजी विक्रेते मैलोन मैल पायपीट करताना रस्त्यावर दिसून येत आहेत. यामध्ये भाजी विक्रेते मंदीतून सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत.

रस्त्यावर पूर्णच शुकशुकाट...त्यात कडाक्याचं पडलेले ऊन... उन्हापासून बचावासाठी कुठलेच डोक्यावर संरक्षण नाही...हाती पाण्याची बॉटल ही नाही...निव्वळ भाजीपाला लादलेली हाती सायकल हाकत नालासोपारा पूर्वेतील असंख्य छोटे भाजी विक्रेते राजोडी ते अर्नाळा भागातून पायपीट करत आहेत.  विशेष म्हणजे वाशीचे एपीएमसी मार्केट बंद असल्याने भाजीपाला, धान्य व विविध मालाची शहरात होणारी आवक घटली आहे. त्यामुळे असंख्य विक्रेत्यांना संध्या वसई, नालासोपारा व विरार मधील गावपट्ट्या तून भाजी खरेदी करावी लागत आहे. त्यातच शहरात अत्यावश्यक सोडून खासगी वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील मंडईत भाजीचं पोहोचत नाही आहे. त्यामुळे भाजी विक्रीसाठी माल कुठून आणावा असा प्रश्न अनेक विक्रेत्यांना पडला होता.

दरम्यान या प्रश्नांवर मात करण्यासाठी भाजी विक्रेत्यांनी सायकल हाती धरत अर्नाळा, राजोडी परिसर गाठायला सुरुवात केली आहे. रोज दुपारनंतर हे भाजी विक्रेते चार-पाच सायकलीसह अर्नाळा परिसरात जातात. तेथील स्थानिक शेतकऱ्याकडून भाजी खरेदी करून ती सायकलवर लादून आपले घर गाठतात. त्यानंतर या भाज्या आपआपल्या परिसरात विकतात. त्यांतून काही पैसे हाती लागल्यावर आपली गुजराण करत आहेत.

विशेष म्हणजे या भाजी विक्रेत्यांना आर्थिक मंदी सतावत आहे. या मंदीतून कसे सावरायचे अशा विचारात ते गुरफटले आहेतं. तज्ज्ञांच्या मते 2009 पेक्षा जास्त भयानक अशी आर्थिक मंदीची लाट येईल. त्यामुळे ते अशाप्रकारे भर दुपारच्या उन्हात भली मोठी पायपीट करून भाजी विक्रीद्वा रे सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे हा प्रयत्न नक्की त्यांना मंदीतून सावरण्यास काही अंश मदत ठरेल अशी अपेक्षा बाळगून ते आहेत.

भाजी विकता येत नसल्याने मंदीची चिंता सतावते होती. त्यामुळे या मंदीतून सावरण्यासाठी आम्ही राजोडी वरून माल आणून विकत आहोत. यामधून थोड फार तरी सावरता येईल.

आत्माराम गुप्ता, भाजी विक्रेता

घरची आर्थिक घडी सोडवण्यासाठी आम्ही घराबाहेर पडलो आहे. असे किती दिवस विना धंद्याचे काढता येणार आहेत. त्यामुळे आम्ही इतक्या लांबून माल आणून विकत आहोत.

राकेश यादव, भाजी विक्रेता

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : बापरे! ...म्हणून त्याने मित्राला सुटकेसमध्ये भरून घरी आणलं, पण...

Coronavirus : ...अन् आईच्या अंत्यसंस्कारासाठी जवानाने केला तब्बल तीन दिवस 1100 किलोमीटरचा प्रवास

Coronavirus : Google ची बातच न्यारी; आजचं Doodle लय भारी, जाणून घ्या खासियत

Coronavirus : चौथ्या दिवशीही सर्व रिपोर्ट निगेटिव्ह, 'या' राज्यात 4 दिवसांत एकही रुग्ण नाही कोरोना पॉझिटिव्ह

Coronavirus : कोरोनाचे थैमान! जगभरात कोरोनामुळे तब्बल 1,14,247 जणांचा मृत्यू, रुग्णांची संख्या 11,853,155 वर

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याVasai Virarवसई विरार