शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीच्या पट्ट्यांकरिता आदिवासींची अद्यापही भटकंती

By admin | Updated: May 10, 2015 01:33 IST

वन हक्क कायदा २००६ अन्वये जिल्ह्यातील अतिक्रमित आदिवासींना जमिनीचे पट्टे मिळण्यास विलंब होत आहे़ ...

वर्धा : वन हक्क कायदा २००६ अन्वये जिल्ह्यातील अतिक्रमित आदिवासींना जमिनीचे पट्टे मिळण्यास विलंब होत आहे़ जिल्ह्यातील आदिवासी अतिक्रमित जमिनीचे पट्टे मिळण्यासाठी संबंधित कार्यालयाच्या पायऱ्या झिजवीत आहेत. संबंधित शासकीय कार्यालयाकडून मात्र आदिवासींना टोलवाटोलवीचे उत्तर देण्यात येत आहेत. आदिवासी विभागाचे राज्यमंत्री रविवारी वर्धेत येत आहेत. त्यांना आदिवासींच्या समस्यांची माहिती आहे. यामुळे ते या समस्येकडे लक्ष देतील काय, असा प्रश्न येथील आदिवासी बांधवांनी केला आहे. या कायद्याची अंमलबजावणी तीन टप्प्यावर होत असून जिल्हा समितीकडून मान्य झालेले दावे मंजूर समजले जातात; परंतु जिल्ह्यात दाव्याबाबत सगळा गोंधळ उद्भवल्याचे चित्र निर्माण झाले आहे़दावे तपासणीच्या प्रक्रियेत निकाली निघालेले प्रलंबित, त्रृटीप्राप्त व नाकारल्या गेलेल्या दाव्याची माहिती आॅनलाईन करण्याची तरतूद आहे़ नमुद प्रपत्रात ही माहिती ग्रामपातळीपर्यंत पोहोचविण्याचा दंडक ुआहे. असे असताना तसे होत नसल्याने लाभ मिळू शकणारा आदिवासी त्यापासून वंचित आहे़त्या प्रकारच्या तक्रारी आयुक्त कार्यालय व प्रकल्प कार्यालय आदिवासी विकास विभाग यांच्याकडे झाल्यात; परंतु कारवाई शुन्य आहे़ ग्रामपातळीपर्यंतची माहिती आदिवासी विकास विभागाकडून न पोहचविल्याने अनेक आदिवासी आपल्या अतिक्रमीत जमिनीच्या पट्ट्याच्या हक्काबाबत अनभिज्ञ आहेत़ वन विभागाकडून तसेच महसूल विभागाकडून सातत्याने या गरीब आदिवासींवर खोट्या केसेस दाखल करीत ओहत. पिके शेतात उभी असताना त्यांची नासधूस केल्या जात आहे. निरपराध आदिवसींना अपराधी घोषित केले जात असल्याचा आरोप आदिवासी नेते अवचित सयाम यांनी पत्रातून केला आहे़ (प्रतिनिधी)