जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला. Read More
जम्मू कश्मीर येथील पुलवामा येथे केंद्रीय राखीव दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ४० जवान शहिद झाल्याची घटना १४ फेब्रुवारी रोजी घडली होती़ या घटनेबद्दल देशभर संताप व्यक्त करण्यात येत असून नांदेडातही भाजपा, शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी यास ...
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर शहरात प्रचंड रोष दिसून येत आहे. शुक्रवारी जागोजागी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. लोकांनी पाकिस्तानविरोधात प्रचंड निदर्शने केली. अनेक ठिकाणी तर पाकिस्तानचे झेंडेदेखील जाळण्यात आले. दहशतवाद्यांव ...
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर विदर्भात संतापाची लाट उसळली आहे. प्रत्येकच जिल्ह्यात विविध संघटना तसेच नागरिकांकडून दहशतवादी तसेच दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानविरोधात निदर्शने करण्यात आली. यात सर्वपक ...