शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा व ग्राहकांना रास्त दरात फळे, भाजीपाला व अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने थेट पणन योजना सुरू केली. २००७ पासून संपूर्ण राज्यात १०१० परवान्यांचे वाटप केले आहे. ...
मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झालेल्या लिलावामध्ये मोहन शंकर माळी फ्रूट कंपनी या आडत दुकानात सलगर (ता. मंगळवेढा) येथील शेतकरी गणपत तेली यांच्या डाळिंबास प्रतिकिलो ३०० रुपये दर मिळाला. ...
राज्यात आज आठवडाभराच्या तुलनेत काहीअंशी कमी ३६५५ क्विंटल टोमॅटो आवक झाली होती. सर्वाधिक लोकल वाणांच्या टोमॅटोचा समावेश असलेल्या आजच्या आवकेत दोन ठिकाणी हायब्रिड, दोन बाजारसमितींमध्ये नं.१ तर केवळ एका ठिकाणी वैशाली टोमॅटोची आवक होती. ...
केळीच्या निर्यातीत अर्धापुरी येथील केळी अव्वल ठरली असून, दीड महिन्यात १५० पेक्षा जास्त ट्रक परराज्यात तसेच विदेशात पाठवण्यात आले आहेत. पुढील काळात १०० ते १५० ट्रक निर्यात केली जाणार आहेत. ...
Soybean & Turmeric Price Crisis: हिंगोली येथील बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात एप्रिल, मेमध्ये सरासरी १६ हजारांवर पोहोचलेल्या हळदीचे भाव सध्या मात्र जवळपास अडीच हजाराने घसरले आहेत. तर सोयाबीनची दरकोंडीही कायम असल्याने पदरी निराशा येत असून, ...
यावर्षी मोठ्या प्रमाणात मिरची पिकाची लागवड केली आहे. परंतु, सतत सुरू असलेला पाऊस व पिकावर आलेला अज्ञात रोगामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात मिरचीने पाणी आणले आहे. लागवड मोठ्या प्रमाणात झाली असली तरी भाव योग्य मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. ...