Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे. Read More
Maharashtra Political Crisis: बेकायदा पद्धतीने स्थापन झालेल्या सरकारला संरक्षण दिले जात असून, न्यायास उशीर करणे सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षित नाही, असे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे. ...
Maharashtra Political Crisis: ही बाब आदित्य ठाकरेंच्या वैफल्यग्रस्ततेचे निदर्शक असून शिल्लकसेनेकडे कार्यकर्तेही उरलेले नाहीत, अशी टीका भाजपने केली आहे. ...
Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरेंनी केलेल्या कारवाईला बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी आव्हान दिले असून, मीच जिल्हाप्रमुख राहणार, असे ठामपण सांगितले आहे. ...
Maharashtra Political Crisis: हा किमान समान कार्यक्रमाचा भाग नव्हता. औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामांतर करताना सुसंवाद साधला गेला नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...