देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
उद्योगपतींचे कोट्यवधींचे कर्ज माफ करणारे मोदी सरकार शेतकरी विरोधी असल्याचाआरोप करीत कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोदी विरोधी घोषणा देत संसद परिसर दणाणून सोडला. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तक वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना राम मंदिर, शिवसेना-भाजपा युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचं राज्यातील अस्तित्व यावर चर्चा केली. ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाढत चाललेली महागाई, सरकारी रूग्णालयात डॉक्टरांची असलेली रिक्त पदे, औषधांचा तुटवडा, महिलांवरील वाढते अत्याचार या विरोधात जिल्हा युवक काँग्रेसने आक्रमक होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत शासनाचे लक्ष वेधले. ...
भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेस पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरलेली दिसत असताना काँग्रेसचे नेतेमंडळीच पक्षाच्या अडचणी वाढवताहेत की काय?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...