देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांनी सीबीआय कार्यालयाबाहेर आंदोलन केले. यावेळेस संजय निरुपम यांच्यासहीत अनेक कार्यकर्त्यांना ... ...
गत चार वर्षात भाजप सरकारने शेतकऱ्यांना फक्त आश्वासन दिले पण वास्तविकतेमध्ये काम करताना या सरकारने शेतकऱ्यांची पूर्णपणे दिशाभूल केलेली आहे. दिलेले आश्वासन हवेतच विसरून गेले आहेत. ...
भाजप सरकारने ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद केली. परिणामी ओबीसी विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी घेण्यात अडचण निर्माण झाली आहे. हा भाजप सरकारचा ओबीसींना दडपण्याचा डाव आहे. ...
संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळतो आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात परिस्थिती अतिशय गंभीर आहे. पण सरकारच्या लेखी लातूर जिल्ह्यातल्या फक्त एका तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. सरकार आंधळे आहे त्यामुळेच सरकारला भीषण दुष्काळ दिसत नाही ...