देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
लडाखमधील घटनाक्रमावरून सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात कमालीचे आक्रमक होत काँग्रेसने पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. ...
यापूर्वी राहुल गांधी यांनी भारत आणि चिनी सैनिकांत झालेल्या हिंसक झटापटीच्या मुद्द्यावर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सर्वपक्षीय बैठकीनंतर केलेल्या विधानावरून प्रश्न उपस्थित केला होता. ...