देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Congress Vijay Wadettiwar: राज्यातील बळीराजाचा विसर केंद्र सरकारला पडता कामा नये. पंतप्रधान मोदी यांनी मदत जाहीर करून अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. ...
Navi Mumbai Airport News: नवी मुंबई विमानतळाला दिवंगत ज्येष्ट नेते दि. बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी स्थानिक जनतेकडून अनेक वर्षांपासून केली जात आहे. मात्र या मागणीवर सरकारकडून अध्यापही अधिकृतपणे कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यावरून आता का ...