देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Malegaon Municipal Corporation Election : मालेगाव येथील महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचाली सुरू झाल्या असून राजकीय युती-आघाड्यांबाबत खलबते सुरू झाली आहेत. ...
महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मतदारांच्या घरोघरी तर उमेदवार पोहोचतातच. पण सोशल मीडियाचा जमाना असल्याने बहुतांशी उमेदवारांनी हायटेक होत सोशल मीडियाद्वारे प्रचारावर भर दिला आहे. ...
चिन्ह, पक्ष विसरून दिग्गज येणार एकाच झेंड्याखाली ? गेल्या चार दिवसांपासून जळगावात अतिशय गोपनीय बैठका पार पडत आहेत. एक बैठक मुंबईत राज्यस्तरीय नेत्यांसोबतही झाली. ...