श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Sudhir Mungantiwar: नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये सत्तेत असूनही भाजपला चंद्रपूर जिल्ह्यात फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. निकाल लागल्यानंतर मुनगंटीवार यांनी पक्षालाच खडेबोल सुनावले होते. त्यानंतर मुंबईत झालेल्या बैठकीनंतर मुनगंटीवारांची ना ...