शहरं
Join us  
Trending Stories
1
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
2
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
3
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
4
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
5
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
6
भाग्यवान! अवघ्या 210 रुपयांत मिळाली 10 लाखांची कार; शेतकऱ्याचं 'असं' फळफळलं नशीब
7
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
8
“वर्षानुवर्षे उत्तर मुंबईची सेवा करत राहीन”; पियूष गोयल यांनी व्यक्त केला विश्वास, उमेदवारी अर्ज भरला
9
'ती' कविता ऐकून थेट उद्धव ठाकरेंचा संकर्षण कऱ्हाडेला फोन, म्हणाले...
10
"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे
11
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
12
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
13
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
14
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
15
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
16
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
17
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
18
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
19
May Born Astro: मे महिन्यात जन्मलेले लोक म्हणजे चेहऱ्याने लोभस, डोक्याने तापट आणि लहरी स्वभावाचे मिश्रण!
20
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार

एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, पालकमंत्री एकनाथ शिंदेचे तातडीने अहवाल देण्याचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2020 10:08 AM

सरकारी यंत्रणेच्या भोंगळ कारभारामुळे गेल्यावर्षी झालेल्या नुकसानीचा मोबदला अजूनही मिळाला नसल्याचा पाढा पालकमंत्र्यांसमोर वाचण्यात आला असता, यावर्षी एकही शेतकरी सरकारी मदतीपासून वंचित राहणार नाही, असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले.

भिवंडी :  परतीच्या पावसाने ठाणे जिल्ह्यातील भातपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या भातपिकांची गुरुवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी तालुक्यातील कांदळी गावात पाहणी करत शेतकरी यांच्याशी संवाद साधला. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. तातडीने पंचनामे करून सरकारकडे तातडीने अहवाल पाठवण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकारी यांना दिले.सरकारी यंत्रणेच्या भोंगळ कारभारामुळे गेल्यावर्षी झालेल्या नुकसानीचा मोबदला अजूनही मिळाला नसल्याचा पाढा पालकमंत्र्यांसमोर वाचण्यात आला असता, यावर्षी एकही शेतकरी सरकारी मदतीपासून वंचित राहणार नाही, असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले. भिवंडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते. यावर्षी तालुक्यात १६ हजार हेक्टरवर भातशेतीची लागवड करण्यात आली होती. मात्र, परतीच्या पावसाने सुमारे आठ हजारांहून अधिक भातशेतीचे नुकसान झाल्याची माहिती शिंदे यांनी दिली.

ठाणे जिल्ह्यात ४५ टक्के नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे पूर्ण झाले असून येत्या चार ते पाच दिवसांत उर्वरित सर्व पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. या पाहणी दौऱ्याप्रसंगी कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, राज्याच्या हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, आमदार शांताराम मोरे, प्रांताधिकारी मोहन नळदकर, ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुषमा लोणे, आरोग्य व बांधकाम समिती सभापती कुंदन पाटील, तहसीलदार अधिक पाटील, गटविकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे व कृषी अधिकारी उपस्थित होते.

मुरबाड तालुक्यातही पाहणी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी शिदवाडी येथील भातशेतीची पाहणी केली. त्यांच्यासोबत जिल्हा कृषी अधिकारी अंकुश माने, तहसीलदार अमोल कदम, जिल्हा परिषद सदस्या प्राजक्ता भावार्थे, रेखा कंटे तसेच कृषी विभागाचे अधिकारी सोबत होते.अवकाळी पावसाने मुरबाड तालुक्यात भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शिदगाव येथील चिमा शिद यांच्या शेताची पाहणी केली. यावेळी संपूर्ण पीक वाया गेल्याने शिद यांना अश्रू अनावर झाले. त्यांचे पाणावलेले डोळे पाहून पालकमंत्री यांनी धीर देत सरकारकडून योग्य ती मदत मिळेल, असे आश्वासन दिले. तशा सूचना जिल्हाधिकारी व कृषी अधिकारी यांना दिल्या. शिद यांच्या पाच एकरमधील सगळा भात कुजला आहे.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाFarmerशेतकरी