शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

घोरपडींची संख्या घटतेय

By admin | Updated: November 2, 2014 23:29 IST

वनविभागाने दखल घ्यावी : शिकारीला आळा घालण्याची गरज

सुरेश बागवे - कडावल -मुळातच दुर्मीळ असलेल्या घोरपडींची संख्या शिकारीमुळे दिवसेंदिवस अधिकच घटत आहे. शिकारीचे प्रमाण कमी झाले नाही तर या प्रजातीचे अस्तित्वच संपुष्टात येण्याची भीती व्यक्त होत आहे. घोरपडींचे अस्तित्व वाचविण्यासाठी वाढत्या शिकारीला वेळीच आळा घालण्याची आवश्यकता आहे. याबाबत वनविभागाने दखल घेण्याची गरज आहे. घोरपडीचे मांस चविष्ट म्हणून तर प्रसिद्ध आहेच, शिवाय ते औषधीही मानले जाते. त्यामुळे या प्राण्याच्या शिकारीचेही प्रमाण अधिक आहे. सह्याद्रीच्या कडेकपारींमध्ये आणि डोंगर दऱ्यांमधील बिळांमध्ये वास्तव्य करणारी ही प्रजाती मुळातच अतिशय दुर्मीळ आहे. शिकार तसेच अन्य कारणांमुळे घोरपडींची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. पुढील काळात शिकारीचे प्रमाण असेच राहिल्यास प्रजाती पूर्णपणे नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. घोरपडींची शिकार करण्याची एक पद्धत पूर्वापारपासून प्रचलित आहे. घोरपडी प्रामुख्याने बिळांमध्ये वास्तव्य करतात. शिकारी लोक सायंकाळच्यावेळी बिळांच्या तोंडावर खुणेसाठी बोटभर लांबीच्या लहान काट्या लावतात. दुसऱ्या दिवशी पाहणी करून लावलेल्या काठ्या कुठच्या दिशेला पडल्या आहेत, यावरून घोरपड बिळात आहे की बाहेर, याचा अंदाज घेतला जातो. हा अंदाज परिपूर्ण होण्यासाठी शिकारी व्यक्तीचा अनुभव व तर्क तेवढाच महत्त्वाचा असतो. घोरपड बिळातच आहे, याची खात्री पटल्यास बिळाच्या तोंडावर आगीचा जाळ केला जातो. धूर आत गेल्यानंतर कासाविस झालेली घोरपड धडपडत बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना बिळाच्या तोंडावरच तिला अलगद पकडले जाते. काहीवेळा धुरामुळे गुदमरून घोरपड बिळातच मृत होते. अशावेळी बिळ खोदून तिला बाहेर काढले जाते. सध्या सकाळच्या वेळी कोवळ्या उन्हात चरण्यासाठी घोरपडी आपला अधिवास सोडून माळरानावर येत आहेत. घोरपडीची चरण्याची विशिष्ट अशी पद्धत असते. तिला स्थानिक ‘चरल’ असे म्हटले जाते. चाणाक्ष शिकाऱ्यांच्या लक्षात घोरपडीची ‘चरल’ आल्यानंतर ‘डाव’ टाकून तिला पकडण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो. एखाद्या ठिकाणी घोरपड चरून गेली की, अनुभवी शिकाऱ्यांच्या ते सहज लक्षात येते. त्याअर्थी तिचा अधिवास जवळच असणार व ती उद्या येथे पुन्हा चरण्यासाठी येणार, हे पक्के हेरू न शिकारीसाठी फिल्डिंग लावली जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी कोवळे ऊन पडल्यानंतर दोन-चार कु त्रे घेऊन शिकारी लोक तिचा माग काढतात. मनसोक्त चरत असलेली घोरपड दृष्टीस पडली की, कुत्रे तिला चारही बाजूंनी घेरतात व अलगदपणे टिपतात. अशा रीतीने आपला अधिवास सोडून चरण्यासाठी आलेल्या घोरपडींना जीव गमवावा लागतो. कोवळे ऊन त्यांच्या जीवावर बेतते. घोरपडीची शेपूट अतिशय विषारी असल्याचे मानले जाते. तिने आपल्या शेपटीचा प्रहार माणसाच्या बेंबीवर केल्यास तो तत्काळ गतप्राण होतो, असा समज ग्रामीण भागात असल्याने घोरपड पकडल्यानंतर प्रथम तिची शेपूट कापली जाते. माणसाच्या मोहाला आवर घालामुळातच दुर्मीळ असलेल्या घोरपडींची संख्या शिकारीमुळे दिवसेंदिवस अधिकच घटत आहे. त्यांच्या शिकारीचे प्रमाण कमी झाले नाही, तर या प्रजातीचे अस्तित्वच संपुष्टात येण्याचा धोका निर्माण झाला आहे. घोरपड या एका प्रजातीचे अस्तित्व पृथ्वीतलावरून नाहीसे होण्याच्या मार्गावर आहे. या पातकापासून माणसाला वाचवायचे असेल, तर प्रत्येकाला घोरपडीच्या शिकारीच्या मोहाला आवर घालावाच लागेल. यासाठी आता प्राणीमित्रांबरोबरच सजग नागरिकांनी विचारमंथन करणे आवश्यक आहे.