शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत एका महिन्यात ९ बळी

By admin | Updated: July 2, 2015 00:29 IST

मोसमी पाऊस : विविध ठिकाणी पडझडीमुळे ७0 लाखांची हानी

रत्नागिरी : जूनमध्ये झालेल्या वादळी पावसाने जिल्ह्यात पडझड झालेली घरे, गोठे, खासगी व सार्वजनिक मालमत्ता तसेच मृत जनावरे यामुळे ६९ लाख ८७ हजार ८७८ रूपयांचे नुकसान झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे आतापर्यंत ९ जणांचे बळी गेले असून, त्यांच्या १२ वारसांना शासनाकडून मदत देण्यात आली आहे.जिल्ह्यात ८ जूनपासून पावसाला प्रारंभ झाला आहे. मात्र, त्याआधी अधूनमधून झालेल्या वादळी पावसाने जिल्ह्यात अनेक घरे, गोठे, सार्वजनिक तसेच खासगी मालमत्तांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गेले आठवडाभर जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली असली तरी त्यापूर्वी पडलेल्या पावसाने अनेक ठिकाणी नुकसान केले आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. छप्परांचे नुकसान, घरांचे पूर्णत: नुकसान तसेच झाडांचेही नुकसान झाले आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांची जनावरे मृत झाली असून, नैसर्गिक आपत्तीने अनेकांचे बळी घेतले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पडझड झालेल्या घरांची एकूण संख्या ५६७ इतकी आहे तर गोठ्यांची एकूण संख्या ५२ आहे. घरांच्या एकूण नुकसानाची रक्कम ५५,७०, १२५ इतकी तर गोठ्यांची ७,१४,०१३ रूपये इतकी नोंदविण्यात आली आहे. अजूनही काही गावांमध्ये पंचनाम्याचे काम सुरु आहे.या महिनाभरातील नैसर्गिक आपत्तीत जिल्ह्यातील मृत जनावरांच्या नुकसानाची रक्कम १,२१,५०० इतकी आहे. जिल्ह्यातील ९ व्यक्तींचा यात बळी गेला आहे. सार्वजनिक ३५ मालमत्तांचे आणि ४ खासगी मालमत्तांचे एकूण ५,८२,२४० रुपयांचे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानापोटी जिल्ह्यातील एकूण ६९,८७८७८ रूपयांच्या नुकसानाची नोंद जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. (प्रतिनिधी) जिल्ह्यात ८ जूनपासून पावसाला प्रारंभ.अधूनमधून झालेल्या वादळी पावसात अनेक ठिकाणी नुकसान.अनेक ठिकाणी पडझड.मृतांच्या १२ वारसांना शासनाकडून मदत.जिल्ह्यात एकूण ६९,८७८७८ रूपयांच्या नुकसानाची नोंद.सार्वजनिक ३५ मालमत्तांचे आणि ४ खासगी मालमत्तांचे एकूण ५,८२,२४० रुपयांचे नुकसान.