शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
5
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
6
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
7
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
8
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
9
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
10
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
11
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
12
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
13
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
14
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
15
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
16
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
17
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
18
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
19
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
20
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
Daily Top 2Weekly Top 5

जावळीत शाळेची घंटा वाजली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:18 IST

कुडाळ : कोरोनाच्या महाभयंकर आजारामुळे गेल्या मार्च महिन्यापासून बंद असलेल्या शाळांची घंटा आता वाजली आहे. याकरिता गेल्या सात दिवसांपासून ...

कुडाळ : कोरोनाच्या महाभयंकर आजारामुळे गेल्या मार्च महिन्यापासून बंद असलेल्या शाळांची घंटा आता वाजली आहे. याकरिता गेल्या सात दिवसांपासून जावळीतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी पूर्ण झाली असून, पंचायत समिती जावळी आरोग्य आणि शिक्षण विभागाकडून यासाठी योग्य नियोजन केले होते.

यावर्षी कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे निम्म्यापेक्षा जास्त शैक्षणिक वर्ष वाया गेले. टप्प्याटप्प्याने २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. तर सद्य:स्थितीत कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने शासनाने पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू केले आहेत. यामुळे प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना अध्यापन होत असल्याने शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तालुक्यातील शाळा आता सुरू झाल्या आहेत. यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तालुक्यातील मेढा, कुडाळ, सायगाव, बामणोली या प्राथमिक आरोग्य केंद्रात पाचवी ते आठवीला शिकवणाऱ्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी पूर्ण झाली आहे.

शासकीय नियमांचे पालन करीत शाळा पूर्वीप्रमाणेच सुरू झाल्या आहेत. कोरोनाच्या काळात ऑनलाईन शिक्षण सुरू होते; परंतु या शिक्षणात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन आता प्रत्यक्ष शिक्षणाला सुरुवात झाली आहे. यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसत आहे. शाळा व परिसर सॅनिटाईज करण्यात आला असून शिक्षकांनी एसओपीचे पालन कसे करावे, काय सावधगिरी बाळगावी, याची माहिती दिली आहे.

शाळेच्या प्रवेशद्वारावर तापमान तपासणारी थर्मल गन, ऑक्सिमीटर अनिवार्य केले असून, विद्यार्थ्यांना पेन, पेन्सिल, पुस्तके एकमेकांना देण्याबाबत निर्बंध घालण्यात आले आहेत. शालेय परिसरात विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच पालकांनी लेखी संमती दिल्याखेरीज विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळणार नाही, असे शिक्षण विभागामार्फत आवाहन करण्यात आले आहे.

(कोट)

कोरोना काळात बराच काळ विद्यार्थी प्रत्यक्ष शिक्षणापासून वंचित होते. यावेळी ऑनलाईन शिक्षणातून त्यांना प्रवाहात ठेवण्याचे प्रयत्न केले. शाळा सुरू झाली असल्याने सर्व पूर्वतयारी केली आहे. प्रदीर्घ काळानंतर मुले शाळेत आल्याने ज्ञानमंदिराचे नंदनवन फुलून गेले आहे. शिक्षक, विद्यार्थी आनंदी, उत्साही आहेत. सर्व परिस्थिती पूर्वपदावर येऊन लवकरच पहिली ते चौथीपर्यंतचे वर्गही सुरू होतील.

-सुवर्णा साळवी, उपशिक्षिका, सरताळे